Rain Update Saam tv
मुंबई/पुणे

Rain Update| पुढील ४ दिवस राज्यातील या विभागात मुसळधार, हवामान विभागाने दिला इशारा

गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: गेल्या दोन दिवसापासून राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. पुढील चारही दिवस कोकणासह राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात काल पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढील चार दिवसांसाठी हवामान विभागाचे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Rain Update)

या जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेज अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पुणे आणि रत्नागिरीसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना १७ सप्टेंबरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर १८ ते २० सप्टेंबरला विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, आणि मराठवाड्यामधील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Rain Update)

आज पहाटेपासून मुंबईसह महानगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसापासून राज्यातील काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. राज्यात गणेश उत्सव काळात पावसाने विश्रांती घेतली होती.

यावर्षीचा मान्सून एक महिना उशीरा सुरू झाला. पण तरीही मान्सून मोठ्या प्रमाणात झाला आहे. विदर्भासह, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. तर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने हजेरी लावली. (Maharashtra Rain Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: मेहेकर तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

कोसळधार! राज्यात पावसाचे ७ बळी; मराठवाड्यात ११ जण बेपत्ता, कुठे कशी परिस्थिती?

Pune Monsoon Update : पुण्याला आज रेड अलर्ट, मुसळधार पावसाने झोडपले, पुणेकराच्या पाण्याचे टेन्शनही संपवले

Kisan Vikas Patra: ११५ महिन्यात पैसे होणार डबल; किसान विकास पत्र योजनेत मिळतो सर्वाधिक परतावा

Mangalwar Upay: मंगळवारच्या दिवशी हनुमानजींचे हे उपाय तुम्हाला करतील मालामाल, आर्थिक तंगी होईल दूर

SCROLL FOR NEXT