Sanjay Raut On Eknath Shinde Saam TV News
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: झारखंड दारू घोटाळ्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निकटवर्तीयाला अटक, संजय राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut On Eknath Shinde: संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला. झारखंडमधील दारू घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले अमित साळुंखे हे उपमुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत.

Priya More

Summary -

  • झारखंड दारू घोटाळ्यात अमित साळुंखे अटकेत

  • संजय राऊतांचानी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंबाबत केला मोठा दावा श्रीकांत शिंदे

  • 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा; टेंडर ६५० कोटींनी वाढवले

  • मंत्रिमंडळात ४ मंत्री बदलले जाणार, संजय राऊतांचा दावा

झारखंडमधील दारू घोटाळा प्रकरणात एसीबीने अमित साळुंखेला अटक केली. या प्रकरणाबाबत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. एसीबीने अटक केलेले अमित साळुंखे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तसंच, राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाला. यासाठी ६०० कोटींनी टेंडर वाढवण्यात आले. या घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशनला वळवण्यात आल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांनी दावा केला की, 'झारखंडमधून एक टोळी आली. अमित साळुंखे यांना अटक केली. अमित साळुंखे सुमित फॅसिलिटी कंपनीचा संचालक असून या कंपनीला १०८ नंबरच्या रुग्णवाहिका चालवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. यामध्ये ८०० कोटींचा घोटाळा महारष्ट्रामध्ये झाला. ६५० कोटींनी टेंडर वाढवले'

अमित साळुंखे हे श्रीकांत शिंदेंचे जवळचे असल्याचे सांगत संजय राऊत म्हणाले की, 'अमित साळुंखे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचे आहे. हे सगळे पैसे श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडे वळवले. ही अटक सहज झाली नाही. हे धागे दोरे कोणापर्यंत पोचले. एकनाथ शिंदे यांच्या मुलाच्या जवळच्या व्यक्तीला अटक करून ते निघून गेले. आता देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळ साफसफाईची गरज आहे.',

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. 'मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे आणि कोणाला काढायचे हा मुख्यमंत्री यांचा अधिकार आहे. तरी रिमोट कंट्रोल अमित शहा यांच्याकडे आहे. मंत्री मंडळात गोंधळाचे वातावरण सुरू आहे. मी काही दिवसांपासून पाहत आहे. चार मंत्री जाणार आहे. माणिकराव , संजय शिरसाट, योगेश कदम, संजय राठोड यांना देखील जावं लागेल. भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य, घोटाळे, पैशांच्या बॅग घेऊन बसणे हे ओझं फडणवीस यांना पेलवत नाही.', असं राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT