Raj Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंना मिळालेली मतं मराठी लोकांची नव्हती, मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंनी नेमकं काय सांगितलं?

Rohini Gudaghe

वैदेही कानेकर, साम टीव्ही मुंबई

मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना मिळालेली मतं ही मराठी लोकांची नव्हती, असं वक्तव्य केलं आहे. मुस्लिम समाजाने मतदान केलं, ते केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होत, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात जातीय राजकारण बघायला मिळालं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला निश्चितच धक्का लागल्याची टीका देखील राज ठाकरेंनी केली आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राजकारण हे अतिशय विकोपाला गेलं आहे. जात आणि समाज या मुद्द्यांवर आधारित मोठ्या प्रमाणात मतदान लोकसभेला झालं आहे, ते अत्यंत हानिकारक असल्याचं राज ठाकरेंनी बैठकीत म्हटलं (Maharashtra Politics) आहे. आपल्याला आगामी निवडणुकीमध्ये २५० आणि कमीत कमी २२५ जागा लोकसभेला उतरवायचे आहेत. मात्र, या राजकारणामध्ये कुठेही धार्मिक आणि जातीयवाद नसला पाहिजे, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) पुढेही म्हणाले की, महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण झालं ते योग्य नाही. महाविकास आघाडीसोबत उद्धव ठाकरे गेल्यामुळे लोकांचा एक वेगळा राग होता. त्यानंतर ४० आमदारांनी शिवसेनेतून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चिन्ह आणि पक्षाचे नाव यावरून ज्या पद्धतीचं राजकारण झालं, त्यामुळे पुन्हा एकदा लोकांची भावना ही उद्धव ठाकरेंसोबत गेल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं (Uddhav Thackeray) आहे.

त्यावेळेस बाळासाहेबांच्या भावनिक असलेल्या गोष्टी म्हणजेच पक्षाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव या गोष्टींना शिंदेंनी हात लावला. त्यामुळे लोकांची सहानभूती पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे गेल्याचं राज ठाकरेंनी बैठकीत (MNS Meeting For Assembly Election) सांगितलं. शरद पवार यांनी ओबीसी, मराठा असं राजकारण केलेले दिसून आलेलं आहे. ते महाराष्ट्राच्या जनतेलाही पटलेलं नसल्याची टीका राज ठाकरेंनी आज मनसेच्या बैठकीत केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Grahan 2024: २ ऑक्टोबरपासून 'या' राशींच्या आयुष्यावर लागणार ग्रहण; 'या' राशींवर घोंगावणार संकट

Crime News : लहान भावाला मारलं म्हणून त्यांनी थेट त्याचं जीवन संपवलं; पुण्यातील थरारक घटना

Bigg Boss Marathi : सूरजाचा तो एक प्रश्न निक्कीला टाकतो कोड्यात, म्हणाली...

Nitin Gadkari : नवीन तंत्रज्ञानाने १० वर्षांत रस्त्यांवर एकही खड्डा पडणार नाही...; गडकरींची भर कार्यक्रमात गॅरंटी

Uday Samant News: पायलटचा टेक ऑफला नकार, उदय सामंतांना करावा लागला कारने प्रवास, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT