Rahul Gandhi  Saam Tv
मुंबई/पुणे

Rahul Gandhi: एक है तो सेफ है...., मोदी सरकारच्या नाऱ्याची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, थेट व्हिडीओ दाखवला

Rahul Gandhi Criticized Modi Government: अदानींच्या निशाण्यावर धारावी असून महाराष्ट्राच्या जनतेचे आणि तरुणांचे स्वप्न मोदी सरकार तोडत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे.

Priya More

Rahul Gandhi PC: 'एक है तो सेफ है...' असा नारा देणाऱ्या मोदी सरकारवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी 'एक है तो सेफ है...' या नाऱ्याची खिल्ली उडवत मोदी सरकारचा हा नारा नेमका काय आहे हे महाराष्ट्रातील जनतेला समजावून सांगितले. राहुल गांधी यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत धारावीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील जनतेच्या हातून धारावीची जमीन हिसकावून घेतली जात आहे.

राहुल गांधी यांनी सांगितले की, 'महत्वाचा मुद्दा एकच आहे एकीकीडे अदानी उभे आहे आणि त्यांचा धारावीकडे निशाणा आहे. अदानींच्या निशाण्यावर धारावी आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे आणि तरुणांचे स्वप्न मोदी सरकार तोडत आहे. ' राहुल गांधी यांनी 'एक है तो सेफ है' असलेला लॉकर दाखवला. त्यामध्ये अदानी आणि मोदींचा‌ फोटो असलेले पोस्टर त्यांनी दाखवले. धारावीत १ लाख कोटींचा धंदा ‌दाखवला आहे. 'सेफ आहे तर कोण सेफ आहे? तर अदानी सेफ आहेत. त्रास आणि नुकसान धारावतील जनेतेचे होणार आहे. एका व्यक्तीसाठी धारावी संपवली जात आहे. नारा त्यांनी दिला आणि आम्ही तुम्हाला समजवले. मोदींनी 'एक है तो सेफ है' हे अगदी योग्य नारा दिला आहे.', असे राहुल गांधी यांनी सांगितले.

तसंच, 'धारावी हे छोट्या मोठ्या बिझनेसचे हब आहे. धारावीकराची जमीन आहे ती. एकाच व्यक्तीला देशातील एअरपोर्ट दिले जात आहे, डिफेन्सची इंडस्ट्री दिली जात आहे, याच व्यक्तीला धारावी दिली जात आहे. पंतप्रधानांचे अदानीसोबत जुनं नातं आहे. सर्वकाही एकट्याने शक्य नाही. अदानी एकटे काहीच करू शकत नाही. त्यांना मोदींचा सपोर्ट आहे. महाराष्ट्राची संपत्ती ही महाराष्ट्रातील जनतेला मिळेल की या एका व्यक्तीला मिळेल?', असा सवाल राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की,'७ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प राज्यातून गेले आहेत. ५ लाख रोजगार त्यातून ‌मिळाले असते. धारावीचा विकास तिथल्या लोकांशी चर्चा करुन केला जाईल. मुंबईच्या जनतेला फायदा होईल असा प्रयत्न केला जाईल.' तसंच, 'महाराष्ट्राची निवडणूक विचारधारांची आहे. एक- दोन अरबपती आणि गरिबांच्या विरोधातली ही निवडणूक आहे. अरबपतींची इच्छा आहे की मुंबईची जमीन त्यांना मिळावी. एका अरबपतीला एक लाख कोटीची जमीन द्यायची आहे.', असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी, २५०० पदांसाठी भरती, पगार ८५००० रुपये; आजच अर्ज करा

Raj & Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचा नवा टीझर; मराठी अस्मितेचा बुलंद आवाज पुन्हा दुमदुमला|VIDEO

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT