...'म्हणून 11 तारखेला महाराष्ट्र बंद'; संजय राऊतांनी सांगितलं कारण SaamTV
मुंबई/पुणे

...'म्हणून 11 तारखेला महाराष्ट्र बंद'; संजय राऊतांनी सांगितलं कारण

शिवसेना या बंद मध्ये पूर्ण ताकदीने सहभागी होणार

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : लखीमपूर Lakhimpur घटनेनंतर शेतकऱ्यांना जागे करता यावं आणि शेतकऱ्यांना जागे करण्याची सुरुवात महाराष्ट्रातून व्हावी यासाठी आपण 11 तारखेचा महाराष्ट्र बंद पुकारला असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत MP Sanjay Raut यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. तसेच आजची पत्रकार परिषद घ्या असं चिपी विमानतळावरून उद्धव ठाकरे, Uddhav Thackeray अजितदादा पवार, Ajit Pawar आणि बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांनी सांगितले त्यामुळे ही पत्रकार परिषद घेतली असल्याचही ते म्हणाले. (Maharashtra Bandh Shiv Sena will participate with full force on 11th)

हे देखील पहा -

तसेच लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ 11 तारखेला बंद पुकारला असून या बंद बाबात राहुल गांधी, Rahul Gandhi शरद पवार Sharad Pawar यांच्याशी चर्चा झाली असून जनता ही जुंपलेली नाही हे दाखवण्याची वेळ आता आली असल्याचही राऊत यावेळी म्हणाले.

शिवसेना या बंद मध्ये पूर्ण ताकदीने सहभागी होणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केलं. खरंतर बंद हा प्रत्येक गोष्टीवर व्हायला हवा पण लोकांच्या भावना त्यांची गरज पाहता ते शक्य नाही असा टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला.तसेच चार शेतकऱ्यांचे खूण करूनही मंत्र्यांचा पोरगा मोकाट फिरत आहे अशी टीका त्यांनी मोदी-योगी सरकारवरती Modi-Yogi Goverment केली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

LPG Crisis : 'गॅस' भडका शमवण्यासाठी ओतणार 'रॉकेल'; टंचाईवर काढला तोडगा, सरकारनं घेतले २ महत्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT