karla malvali villagers criticises government small bridge washed away near indrayani river Saam Digital
मुंबई/पुणे

Indrayani River Bridge : इंद्रायणी नदीवरील साकव पुल वाहून गेला, मळवली कार्ला ग्रामस्थ आक्रमक

दिलीप कांबळे

लोणावळ्यात पावसाचा जाेरदार वाढला आहे. परिणामी इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ हाेऊ लगाली आहे. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे कार्ला मळवली गावांना जोडणारा इंद्रायणी नदीनजीकचा साकव पूल तयार पूल वाहून गेला आहे. यामुळे परिसरातील चार गावांचे दळणवळण पूर्णत: थांबले आहे. प्रशासनाने तात्काळ उपाययाेजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कार्ला मळवली या गावांना जोडणारा इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. त्याचा फटका चार गावांना बसला आहे. यापुलाचे काम सुरू असताना ग्रामस्थांना रहदारीसाठी नदीवर एक साकव पूल तयार करण्यात आला होता.

दरम्यान पावसामुळे नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी साकव पूल वाहून गेला. त्यामुळे या गावातील दळणवळण यंत्रणा ठप्प होण्याची चिंता ग्रामस्थांना पडली आहे. त्यातच संथ गतीने सुरु असलेल्या कामाबाबत वारंवार तक्रार करुनही मार्ग निघत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

Mithila Palkar: वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो

SCROLL FOR NEXT