Kalyan Dombivli News: Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Dombivli News: पालिकेचे रुग्णालयात स्मार्ट कधी होणार? १२ तास उलटूनही मृतदेहाचं शवविच्छेदन नाही, कुटुंबीयांनी व्यक्त केला संताप

Kalyan Dombivli News in Marathi: १२ तास उलटून गेले तरी त्याच्या मृतदेहाचे शववि्च्छेदन करण्यात आलं नसल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. केडीएमसीच्या रुक्मीणीबाई रुग्णालयातील हा प्रकार आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, कल्याण

kalyan latest News:

डोंबिवलीत एका व्यक्तीची हत्या झाल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केडीएमसीच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला. मात्र, १२ तास उलटून गेले तरी त्याच्या मृतदेहाचे शववि्च्छेदन करण्यात आलं नसल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे.

फॉरेन्सिक तज्ज्ञ नसल्याने रुक्मिणी रुग्णालयातील डॉक्टरांनी हतबलता व्यक्त करत मृतदेह तब्बल 12 तासानंतर मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आल्याचे सांगितले. यामुळे पालिकेच्या रुग्णालयात रुग्णांना सुविधा कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं ?

डोंबिवली परिसरातील आडवली परिसरातील अब्दुल उर्फ वाजीद सय्यद या व्यक्तीची त्याच्या मित्रांनी हत्या केली. मानपाडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत वाजीदचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवला. मात्र रात्र घरापासून ते आज दुपारी दीड वाजेपर्यंत हा मृतदेह रुपेरी हॉस्पिटलमध्ये होता. या मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ शकले नाही. त्यामुळे नातेवाईकांसह पोलीस देखील ताटकळत उभे राहिले.

रुक्मिणी बाई रुग्णालयात फॉरेन्सिक तज्ज्ञ नसल्याने शवविच्छेदन होऊ शकत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. त्यानंतर हा मृतदेह जे.जे. रुग्णालयात पाठवणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. हे ऐकल्यानंतर मृताच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. रुग्णालयात फॉरेन्सिक डॉक्टर का उपलब्ध नाही, असा सवाल उपस्थित केला .

मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना

कुटुंबाच्या आरोपांनंतर रुक्मिणी रुग्णालयातील डॉक्टर पराग पाडवी यांनी रुग्णालय प्रशासनाची बाजू स्पष्ट केली. डॉक्टर पराग पाडवी म्हणाले, मृतदेह रात्री आणला होता. कोळसेवाडी पोलिसांनी हा मृतदेह आणला होता. त्यानंतर हे प्रकरण मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निघालं. या घटनेच्या पंचनाम्याला उशीर झाला. आता पंचनामा मिळाला आहे.

'या घटनेत गंभीर गुन्हा आहे. आपल्याकडे फॉरेन्सिक तज्ज्ञ नाही. या प्रकरणात फॉरेन्सिक तज्ज्ञाची मदत घ्यावी लागते. हे प्रकरण गंभीर गुन्ह्याचं आहे. डोंबिवलीत शवविच्छेदन सुरु नसल्याने लोकांचे हाल होत आहे. त्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. ही एक इच्छा आहे', असे ते म्हणाले.

रुग्णालय स्मार्ट कधी होणार?

दरम्यान, स्मार्ट सिटीचा दावा करणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय, शास्त्रीनगर रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे. यामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. या कारणामुळे रुग्णांना ठाणे किंवा मुंबई गाठावे लागते.

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात शवविच्छेदनाच्या सुविधा नाही. कल्याणमधील रुग्णालयात शवविच्छेदनाची सुविधा असली, तरी तिथे तज्ज्ञ डॉक्टर्स नाहीत. त्यामुळे ही रुग्णालय स्मार्ट कधी होणार, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल, स्व. हेमंत करकरे यांच्या आठवणी ताज्या

Mugachi Khichdi Recipe: मऊ, लुसलुशीत मुगाची खिचडी कशी बनवाल?

Ulhasnagar: घराबाहेर पडला अन् टेरेसवर जाऊन स्वत:ला पेटवून घेतलं; उल्हासनगरमध्ये खळबळ

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन १० दिवस बंद राहणार! | VIDEO

Bank Jobs: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ३३० पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT