Water Supply Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Dombivli : कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांना धो-धो पाणी मिळणार; ३५७ कोटी रुपयांच्या योजनेला मिळाली मान्यता

thane Kalyan News : कल्याण-डोंबिवतील २७ गावांचा मोठा प्रश्न सुटला आहे. पालिकेत अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेला मान्यता मिळाली आहे. ३५७ कोटी रुपयांच्या योजनेला पाठिंबा मिळाल्याने कल्याणकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Saam Tv

मुंबई : कल्याण डोंबिवती महापालिकेत राहणाऱ्या लोकांसाठी दिलासायक बातमी हाती आली आहे. कल्याण-डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. तब्बल ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला. यामुळे महापालिकेत नव्याने समाविष्ट २७ गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

या योजनेमुळे नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांना दिलासा मिळणार आहे. ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. या योजनेला मान्यता मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना नागरिकांना व्यक्त केली.

सध्या कल्याणमध्ये अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन आणि हरित क्षेत्र विकास इत्यादी सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुधारित तांत्रिक बदल प्रस्तावाला राज्यस्तरीय तांत्रिक समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये मंजूरी देण्यात आली होती. या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

अमृत अभियानाची प्रकल्प विकास व व्यवस्थापन सल्लागार असणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सादर केलेल्या तांत्रिक बदलाच्या ३५७.१६ कोटी रुपयांच्या प्रकल्प किंमतीस मान्यता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

या योजनेचा लाभ कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना होणार आहे. त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा होण्याबरोबरच १०५ दलघमी साठवण क्षमता देखील निर्माण होणार आहे. या योजनेला मान्यता देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीकरांना दिला होता. हा दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT