Jitendra Awhad And Umesh Khade Saam Tv
मुंबई/पुणे

Jitendra Awhad On Umesh Khade:...तर व्यथा मांडणाऱ्या प्रत्येकालाच अटक करा; रॅपर उमेश खाडे प्रकरणी जितेंद्र आव्हांडाचं ट्वीट चर्चेत

Rapper Umesh Khade(AKA Shambho Rap): या गाण्याप्रकरणी उमेश खाडे (Umesh Khade) आणि त्याच्या आई-वडिलांना वडाळा पोलिसांनी (Wadala Police) ताब्यात घेतलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : रॅपर उमेश खाडेचे (Rapper Umesh Khade) 'भोंगळी केली जनता' हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. या वादग्रस्त गाण्यामुळे उमेश खाडे अडचणीत आला आहे. या गाण्याप्रकरणी उमेश खाडे आणि त्याच्या आई-वडिलांना वडाळा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उमेश खाडे याला पोलिसांनी सोडून द्यावे यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटिझन्स मागणी करत आहेत.

अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awhad) यांनी उमेश खाडेच्या सुटकेची मागणी केली आहे. याप्रकरणी आव्हाडांनी ट्वीट करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर किती जणांना तुम्ही अटक करणार आहात.', असा सवाल केला आहे.

उमेश खाडेचे 'भोंगळी केली जनता' हे गाणं तीन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाले होते. या गाण्याच्या माध्यमातून त्याने सर्वसामान्य जनतेची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या गाण्यात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी उमेश खाडे आणि त्याच्या कुटुंबियांना वडाळा पोलिसांनी ताब्यात घेतलं.

याच प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी उमेश खाडे याचं गाणं ट्वीट करत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, 'भोंगळी' हे रॅप गाणं तयार करणारा तरुण कलाकार उमेश खाडे आणि त्याच्या आई-वडीलांना वडाळा पोलिस स्टेशनमध्ये डांबून ठेवले आहे. या गाण्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्याने कोणाचेही नाव घेतलेले नाही.'

आव्हाडांनी ट्वीटमध्ये पुढे असे लिहिले आहे की, 'आपल्या गरीबीवर तो या गाण्यामध्ये व्यथीत होऊन बोलला आहे. आता व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणा-या प्रत्येकालाच अटक करा. असे किती जणांना तुम्ही अटक करणार आहात.' असा सवाल त्यांनी केला आहे. तसंच, 'तुम्ही लोकांच्या भावना अशाप्रकारे दाबू शकत नाही. हे पोलीसी राज नाही. लोकशाहीमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही असे आपल्याला चिरडू देणार नाही. उमेश खाडेला लगेच सोडा.', अशी मागणी त्यांनी केली आहे.

तंसच,'पोर-पोरींनो व्यक्त व्हा...फासा लटकवणार का … मी कायम तुमच्या बरोबर आहे.', असे आवाहन त्यांनी तरुणांना केले आहे. त्यासोबत, 'तुकाराम जेलमध्येच बसले असते. यांनी तर नामदेव ढसाळ ह्यांना आयुष्यभर जेलमध्ये बसवले असते. विद्रोह हा महाराष्ट्राच्या अणुरेणूत आहे.', असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाडांनी आणखी एक ट्वीट करत ठाण्यामध्ये रॅपर्सला घेऊन कार्यक्रम करणार असल्याचे सांगितले. या ट्वीटमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, 'मी सगळ्या रॅपर्सला एकत्र करुन ठाण्यात कार्यक्रम करणार आहे. आपल्या भाषेत व्यक्त होणे हे बाबासाहेबांनी दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. विद्रोह हा बुद्धापासून तुकारामापर्येंत सगळयांनी केला. शीव, शंभु, फुले, आंबेडकरांनी देखील विद्रोह केला आणि समाजाला दिशा दिली.', असे म्हटले आहे.

Edited By - Priya Vijay More

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT