Mumbai news  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai | मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू

पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे

Mumbai News : पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. या शेतकऱ्याने स्वत:ला जाळून घेतल्यानंतर तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते. आज, या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान शेतकऱ्याचा (Farmer) मृत्यू झाला आहे.

सुभाष भानुदास देशमुख असे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सदर शेतकरी हे साताऱ्यातील कांदळगावचे रहिवासी आहेत. या सुभाष भानुदास देशमुख यांनी २३ ऑगस्ट रोजी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेत त्या शेतकऱ्याला लागलेली आग विझविली. त्यानंतर पोलिसांनी शेतकरी सुभाष भानुदास देशमुख यांना रुग्णालयात दाखल केले. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.

सुभाष भानुदास देशमुख यांनी आत्मदहन केल्यानंतर गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना जीटी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, आज त्यांचा पावणे बाराच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉक्टर सागर गुंडेवाल यांनी सुभाष देशमुख यांच्या मृत्यूबाबत माहिती दिली. सुभाष देशमुख हे ४५ टक्के भाजले होते. गावाकडे जमीन हडपल्याच्या वादातून त्यांनी आत्महत्येचा केल्याचे प्राथमिक तपासात माहिती पुढे आली होती.

'शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये,सरकार तुमचं आहे'

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने तब्बल चार लाख हेक्टरवरील पीक खरडून गेली.कृषीमंत्री स्वतः दौरा करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र अद्यापही नुचसानीचे पंचनामे झाले नाही,त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदती पासून वंचित आहे.त्यातच जिल्ह्यात दररोज शेतकरी नापिकीला कंटाळून आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांच्या या आत्महत्येवरून बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना संदेश दिला आहे. 'शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये,सरकार तुमचं आहे, असे बावनकुळे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh: 64 घरांची राणी वर्ल्डकप विजेत्या दिव्या देशमुखबद्दलच्या 'या' 10 गोष्टी जाणून घ्या

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

Pune News: पुण्यात दिवसभरात दुसरी आत्महत्या; तृतीयपंथीनं खडकवासला धरणात उडी मारून मृत्यूला कवटाळलं

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT