नवले पुलावर भरधाव कंटेनरचा भीषण अपघात
अपघातात ८ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी
कंटेनरने अनेक वाहनांना धडक देऊन पेट घेतला
१५ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
गेल्या ८ वर्षांत २१० अपघात
पुण्यातील गजबजलेल्या नवले पुलावर काल संध्याकाळी अग्नितांडव पाहायला मिळाला. एका भरधाव वेगात आलेल्या कंटेनर ने अनेक गाड्यांना धडक देत एका ट्रकला धडक दिली. या धडकेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या लोकांमध्ये एका अपघात इतका भीषण होता की गाड्यांच्या अक्षरशः चेंदामेंदा झाला. दरम्यान गेल्या आठ वर्षांत या परिसरात २१० हून अधिक अपघात झाले आहेत तर ८२ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर उपाय म्हणून लवकरात लवकर रिंगरोड तयार करून अवजड वाहनांची वाहतूक बाहेरून करा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नवले पुलावर काल संध्याकाळी भीषण अपघात घडला. साताराहून पुण्याच्या दिशेने येत असताना नवले पुलावर असलेल्या उतारावर एका भरधाव वेगात आलेल्या कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. या कंटेनरने पुढे असलेल्या अनेक गाड्यांना धडक देत एका ट्रकला धडक दिली. यानंतर या धडकेत कंटेनर ने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत एका चारचाकी मधील कुटुंबाचा मृत्यू झाला. अपघातात आत्तापर्यंत ८ जणांचा मृत्यू जणांचा मृत्यू झाला, तर १५ जणं जखमी असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अपघात इतका भीषण होता की गाड्यांच्या अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातामुळे रस्त्यावर काचांचा ढीग पडला होता.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ०५ : ४० वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात नवले पुलावर अपघात होऊन तीन वाहनांनी पेट घेतला आहे अशी माहिती मिळाली. त्याचवेळी तात्काळ सिंहगड, नवले, काञज, एरंडवणा टँकर, मुख्यालयातील रेस्क्यु व्हॅन तसेच पीएमआरडीए येथील एक रेस्क्यु व्हॅन व दोन फायरगाडी अशा एकूण ८ अग्निशमन वाहने रवाना झाली होती. घटनास्थळी पोहचताच जवानांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून ट्रॅक चालक, मालक आणि क्लीनर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या आठ वर्षांत या परिसरात २१० हून अधिक अपघात झाले आहेत, तर ८२ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात प्रवाशांसह काही स्थानिक नागरिकही मृत्यमुखी पडले आहेत.यावर प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजना केल्या मात्र ठोस उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे म्हटलं जात आहे. गेल्या कित्येक वर्षापासून शेकडो लोकांचे बळी नवले पूल , कात्रज रस्ता, नऱ्हे, येथील महामार्गावर झालेले आहेत.
या परिसरात अपघात झाला की अनेक वेळा वाहनचालकांची चुकी, ब्रेक फेल, अवजड वाहनांवरील नियंत्रण सुटणे अशीच कारणे समोर येतात. मात्र या अपघाताचे प्रमुख कारण आहे ते म्हणजे या परिसरातील असणारा तीव्र उतार. तो उतार कमी करणे हाच त्यावरचा पर्याय आहे किंवा लवकरात लवकर रिंगरोड तयार करून अवजड वाहनांची वाहतूक बाहेरून करा,अशी मागणी वारंवार केली जाते आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.