राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या पडळकरांच्या जीवाला धोका
राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या पडळकरांच्या जीवाला धोका  Saam Tv
मुंबई/पुणे

राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या पडळकरांच्या जीवाला धोका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra fadnavis यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav thackeray यांना पत्र लिहिले आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या Gopichand padalkar जीवाला धोका असल्याचे त्यांनी या पत्रामध्ये सांगितले आहे.

हे देखील पहा-

बहुजनांच्या बाजूने उभे राहिल्यामुळे यामधून दुखावलेले लोक गोपीचंद पडळकरांवर सातत्याने हल्ला करत आहेत, असे फडणवीस यांनी पत्रामध्ये सांगितले आहे. "लोकशाहीमध्ये विरोधकांचा आवाज हिंसेने दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विरोधक असो किंवा सत्ताधारी ज्यांच्या जिवास धोका आहे, त्याला संरक्षण दिले पाहिजे" असे फडणवीस यांनी सांगितले आहे.

विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी, अशी मागणी फडणवीसांनी पत्राद्वारे करण्यात आली आहे. "त्यांच्या जिवास काही बर वाईट झाल्यास ही राज्य सरकारची जबाबदारी असणार आहे. पडळकरांना तात्काळ सुरक्षा द्या" अशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे देखील पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nigeria Bomb Blast: प्रॉपर्टीच्या वादातून प्रार्थनास्थळात बॉम्बस्फोट; ८ जणांचा मृत्यू, १६ जखमी

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

Daily Horoscope: कष्टाला पर्याय नाही, 'या' ३ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार; तुमच्या राशीत काय?

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

SCROLL FOR NEXT