Deepak Kesarkar News, Shivsena News, Maharashtra Political Crisis Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेना संपवण्याचा राष्ट्रवादीने प्रयत्न केला; दीपक केसरकरांचा हल्लाबोल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) राजीनाम्यानंतर शिंदे गटाने कुठलाही जल्लोष केलेला नाही. जर सेना आणि भाजपामध्ये अडीच अडीच वर्षे पद घ्यायचे असे ठरले असते आणि त्यावेळी उध्दव ठाकरे यांना पद सोडावे लागले असते तर तसेच झाले असते. उध्दव ठाकरे यांना शरद पवारांनी घरी बसवले. ज्या पवारांनी या पदावर बसण्याचा आग्रह केला तेच पवार याला जबाबदार आहेत. शिवसेना संपवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) प्रयत्न केला असल्याचा आरोप एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे.

आमचे समविचारी पक्ष आहेत त्यांच्याबरोबर युती करायची होती. काल उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही सेलिब्रेशन केलेले नाही, मनातून दुःख झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर कायमच आहे, असंही दीपक केसरकर म्हणाले.

आमच्यामध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मंत्रिपदाबद्दल अजुन कोणतीही चर्चा झालेली नाही. यादी व्हायरल होत आहे ती खोटी आहे, त्यामुळे त्या यादीवर विश्वास ठेवू नका, असंही केसरकर म्हणाले. मंत्रिपदासाठी कोणताही आमदार आलेला नाही. आम्ही विचारासाठी एकत्र आलो आहोत, असंही केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन तास चर्चा झाली. यामध्ये जे काही करायचे आहे महाराष्ट्राच्या हितासाठी करायचे असा निर्णय झाला. शिवसेना हा पक्ष संपवायचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू होता. ज्यावर पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा कुठब प्रमुख म्हणून इथल्या सगळ्यांनी प्रश्न मांडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने आमचा उमेदवार पाडला, जर आमचा उमेदवार पाडत असाल तर आम्ही इथे कशाला राहू, असंही केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.

शिवसेनेत कुणाचाही उद्धव ठाकरे यांना विरोध नाही. पंधरा लोकांच्या सहीने आमचे नेते एकनाथ शिंदे यांना काढून टाकण्यात आले. आम्ही सुरवातीपासून उध्दव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी सांगत होतो . मात्र ते आज ही महाविकास आघाडी सोडायला तयारी नाहीत. एकदा दुसऱ्या पक्षाला शब्द दिला तो बदलू शकत नव्हतो, एकनाथ शिंदे हे तर दिघे साहेबांचे मानसपुत्र आहेत ते कधीच बदलणार नाहीत, असंही दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.

आम्ही कुणीही उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. आज महाराष्ट्रात सकाळी उठून पत्रकार परिषद घ्यायची आणि राज्य आणि केंद्र यांच्यात भांडण लावायची, असा टोला संजय राऊत यांना लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT