चास कमान धरण ओव्हरफ्लो; पिण्याच्या पाण्यासाठी प्रश्न मिटला रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

चास कमान धरण ओव्हरफ्लो; पिण्याच्या पाण्यासाठी प्रश्न मिटला

चास-कमान जलाशय 100 टक्के भरला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोहिदास गाडगे

पुणे - गेल्या पंधरा दिवसांपासून भीमाशंकर Bhimashankar परिसरात पावसाची Rain जोर कायम असल्याने भिमानदीवरील चास-कमान जलाशय 100 टक्के भरला आहे. आज सकाळी पाण्याचा विसर्ग 900 क्युसेसने भिमानदी Bhima River आणि डाव्या कालव्यात सुरु करण्यात आला आहे. चास-कमान धरणातुन भिमानदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पुढील काळात धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे देखील पहा -

चास कमान धरणातील पाणीसाठा वर्षभर शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापरला जातो त्यामुळे शेतकरी वर्गासह नदीकाठच्या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न या निमित्ताने मिटणार आहे. भीमाशंकर परिसरात पावसाची संततधार सतत सुरु असल्याने डोंगरमाथ्यावरुन खळखळ वाहणारे ओढे,नाले,दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा भिमानदी पात्र येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पठ्याने चक्क पेट्रोलसाठी आणली 500 लिटरची टाकी, पाहा VIDEO

Sunil Pal: मुंबईत प्रसिद्ध कॉमेडियनचा अपमान; मंचावर बोलावून सत्कार केला, नंतर माईक हिसकावून खाली पाठवलं, VIDEO व्हायरल

Morning Diet Mistakes: सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ खाणं टाळा

IPLच्या सुरुवातीला घडली भयंकर घटना; स्पर्धेतील महत्त्वाच्या व्यक्तीचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Heart attack symptoms: रात्री झोपेत छातीत अचानक वेदना होतात? दुर्लक्ष करू नका, या गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT