Chitra Wagh News Saam TV
मुंबई/पुणे

Chitra Wagh News: आणखी श्रद्धा होऊ नयेत ही पालक म्हणून आपली ही जबाबदारी - चित्रा वाघ

पालक म्हणून जो संवाद गरजेचा आहे तो कायम ठेवल्यास या गोष्टी टाळणे शक्य आहे, असे मत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

३६३ च्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक वाढ

श्रध्दाच्या प्रकरणातून एक मोठा धडा मिळालेला आहे. एक गंभीर बाब समोर आली आहे ती म्हणजे मुलींचे गायब होण्याचे अपहरणाचे प्रमाण, ३६३ चे गुन्हे जास्त प्रमाणात वाढले आहेत. यात अनेक मुली १८ वर्षांखालील आहेत. त्यामुळे पोलिसांनी (Police) त्यांच्याकडे अधिक लक्ष दिल्याने बऱ्याच मुलींना घरी परत आणण्यात यश आले आहे. मात्र या मुलींचे गायब होण्याचे कारण फक्त अपहरण नसून काही मुलींना प्रेमाची फुस लावल्याने त्या स्वत:हून गेलेल्या आहेत, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

Chitra Wagh Latest News:दिल्ली येथे झालेल्या श्रध्दा वालकर हत्याकांडाची झळ संपूर्ण देशाला बसली आहे. प्रत्येक व्यक्ती या घटनेमुळे हळहळ आणि संताप व्यक्त करत आहे. या घटनेने पुन्हा एकदा स्त्रियांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. श्रद्धा तर गेलीच, पण आणखी श्रद्धा होऊ नयेत ही पालक म्हणून आपली ही जबाबदारी आहे. पालक म्हणून जो संवाद गरजेचा आहे तो कायम ठेवल्यास या गोष्टी टाळणे शक्य आहे, असे मत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं आहे. (Chitra Wagh On Shraddha Walkar Case)

पालकांचं विशेष लक्षं असणं गरजेचं

पालकांच्या (Parents) जबाबदारी विषयी त्यांनी सांगितले की, अशा प्रकरणात अनेक मुली घरी परत आल्यावर त्यांचे पालक बदनामी आणि पोलिस चौकशी यांच्या भीतीने तक्रार दाखल करत नाहीत. त्यामुळे अशी अनेक प्रकरणं दाबून टाकली जातात. मात्र प्रत्येक पालकाने मुलगी किंवा मुलगा यांच्याशी संवाद साधला पाहिजे त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, असं आवाहन चित्रा वाघ यांनी पालकांना केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT