'जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गणरायाच्या चरणी प्रार्थना! SaamTV
मुंबई/पुणे

'जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो' मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गणरायाच्या चरणी प्रार्थना!

मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते वर्षा या निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक

मुंबई : जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली असून कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते वर्षा या निवासस्थानी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली, यावेळी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.(Chief Minister Uddhav Thackeray's prayer to Ganarayya)

हे देखील पहा-

आजपासून श्री गणरायाचं आगमन होत आहे राज्यासह देशातील अनेक नेतेमंडळी अभिनेत्यांनी गणरायाची प्रतिष्ठापणा केली आहे तसेच आता राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही आपल्या शासकीय विश्रामगृहामध्ये गणरायाची प्रतिष्ठापणा केली आहे यावेळी त्यांनी गणरायाजवळ, 'जे जे काही अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी आजच्या दिवशी गणरायाच्या चरणी केली असल्याच ते म्हणावे शिवाय आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर, जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं अगदी परदेशात देखील श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा मनोभावे केली जाते. सलग दुसऱ्या वर्षी देखील आपण कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतोय. एरव्ही गणेशोत्सव म्हटला की, गर्दी आणि धुमधडाक्यातला जल्लोष असं चित्र असायचं. मात्र दोन वर्षापासून कोरोनाने आपल्या पायात बेड्या अडकवल्या आहेत. कितीही मनात असलं तरी आपल्याला काही गोष्टींवर बंधनं आणावी लागत आहेत. शेवटी उत्सवापेक्षा लोकांच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देणे हे सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले

गणरायाला विघ्नहर्ता असं म्हणतात. तो हे संकट कायमचं दूर करेल अशी मला खात्री आहे असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला, लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्याविरुद्ध जनतेच्या मनातल्या असंतोषाला तोंड फोडण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले होते, आज आपण सर्वांनी तसेच विविध मंडळ, संस्था यांनीदेखील कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या महामारीतून आपली मुक्तता व्हावी म्हणून प्रयत्न करायला हवेत. एक जबाबदार नागरिक म्हणून कोरोनाविरुद्ध प्रखर आंदोलन आपण सुरू करूयात ही शपथ आजच्या या मंगल दिनी घेऊयात अस आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT