Maharashtra Politics News Saam TV
मुंबई/पुणे

Political News : उद्धव ठाकरेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी; देवेंद्र फडणवीसांना व्हिलन केलं जातंय; बावनकुळे कडाडले

Maharashtra Politics News : उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकर असून देवेंद्र फडणवीस यांना व्हिलन केलंय जातंय, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Satish Daud

उद्धव ठाकरेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी असून देवेंद्र फडणवीस यांना व्हिलन केलंय जातंय, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी २० रात्र जागून मराठा आरक्षण देणारा कायदा केला. पण उद्धव ठाकरे यांच्या सरकारने सुप्रीम कोर्टात महत्वाचा मुद्दा मांडला नाही, असा आरोपही बावनकुळे यांनी केला. ते पुणे येथील भाजपच्या महाअधिवेशनात बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपचे महाअधिवशेन होत आहे. आज या अधिवेशनाला सुरुवात झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय स्तरावरील नेते, मंत्री या अधिवेशनाला उपस्थित आहेत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, भुपेंद्र यादव, पीयूष गोयल, आशिष शेलार, पंकजा मुंडे, मंगल प्रभात लोढा यांचीही अधिवेशनाला उपस्थिती आहे.

दरम्यान, या अधिवेशनात भाषण करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. बावनकुळे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. मी त्यावेळी मंत्री होतो. देवेंद्र फडणवीस यांनी सलग २० रात्र जागून मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला होता. त्यावेळी आम्ही त्यांना म्हणायचो, की तब्येतीची काळजी घ्या".

"शेवटी त्यांनी मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला. विधीमंडळात तो एकमताने मंजूर करण्यात आला. हायकोर्टाने देखील या कायद्याला मंजूरी दिली. पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आणि कमजोर आहे, त्यामागचा भाग सुप्रीम कोर्टात मांडला नाही. त्यामुळे मराठा आरक्षण रद्द झालं, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

"जर उद्धव ठाकरे यांनी जर सुप्रीम कोर्टात ४ चांगले उच्चस्थरीय वकील दिले असते. तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न कायमचाच सुटला असता. पण असं झालं नाही. त्यामुळे मराठा समाजाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत. आज सामाजिक आंदोलनाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना व्हिलन केलं जातंय. काहींच्या तोंडातून राजकीय वास येतोय", अशी टीकाही बावनकुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

SCROLL FOR NEXT