मुंबई/पुणे

Mumbai News: महापालिकेने शिवसेना शाखेतील बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा आरोप; प्रशासनाने दिलं 'हे' स्पष्टीकरण

ठाकरे गटाने शाखेतील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा आरोप केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News: वांद्रे पूर्व येथील शिवसेना शाखेवर मुंबई महापालिकेने निष्कासनाची कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान, ठाकरे गटाने शाखेतील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर मुंबई महापालिकेने स्पष्टीकरण दिलं आहे. (Latest Marathi News)

एच पूर्व विभागाअंतर्गत वांद्रे पूर्व येथील राजकीय पक्षाशी संबंधित बांधकामावर बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेली निष्कासनाची कारवाई ही नियमानुसार केलेली आहे. तसेच, सदर कारवाई करताना छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा / पुतळ्यांचा अवमान झालेला नाही, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

सदर निष्कासन कारवाई संदर्भात महानगरपालिका प्रशासनावर होत असलेले आरोप लक्षात घेता, जनमानसात गैरसमज पसरू नये यासाठी सदर स्पष्टीकरण करण्यात येत आहे.

महापालिकेचं म्हणणं काय?

मुंबई महापालिकेच्या एच पूर्व विभाग कार्यालयाने सह पोलीस आयुक्त यांच्याकडे दिनांक २० जून २०२३ रोजी झालेल्या बैठकीच्या संदर्भाने वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई हाती घेतली होती. त्यासोबत अनधिकृत फेरीवाल्यांविरूद्धही कारवाई करण्यात आली होती.

सदर संपूर्ण कारवाई नियमानुसार आणि योग्य पद्धतीने करण्यात आली. तथापि, या कारवाईबाबत आक्षेप नोंदवत काही घटकांनी सदर कारवाई प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा/ पुतळ्यांचा अवमान झाल्याचा आरोप केला आहे. याअनुषंगाने प्रसारमाध्यमांमध्येदेखील वृत्त प्रसिद्ध झालं.

प्रशासनावरील आरोप चुकीचे - BMC

सदर वेळेत बांधकामधारकांनी सर्व प्रतिमा / पुतळे आणि इतर साहित्यदेखील काढून नेले. त्यानंतर सदर बांधकामावर निष्कासन कारवाई सुरू करण्यापूर्वी प्रशासनाने संपूर्ण बांधकामाची चित्रफित केली व नंतरच बांधकाम निष्कासित केले.

या चित्रफितीचे अवलोकन केले तर संबंधित ठिकाणी कोणतेही साहित्य, प्रतिमा / पुतळे नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. म्हणजेच प्रतिमा / पुतळे यांचा अवमान केल्याचे महानगरपालिका प्रशासनावर केलेले आरोप हे चुकीचे आहेत, हे स्पष्ट होते.

याठिकाणी प्रकर्षाने नमूद करण्यात येते की, उर्वरीत ज्या दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली, तीदेखील अन्य राजकीय पक्षांशी संबंधित होती. याचाच अर्थ प्रशासनाने नियमानुसार कारवाई केली असून कोणत्याही प्रकारे आकस बुद्धीने कारवाई केलेली नाही.

एवढेच नव्हे तर अनधिकृत बांधकामांसह परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरदेखील कारवाई केली. यावरून हे स्पष्ट होते की, महानगरपालिका प्रशासनाने नियमित व योग्य पद्धतीने कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले; गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली|VIDEO

Maharashtra Live News Update:पुणे नाशिक महामार्गावरील भिमा नदीच्या पुलावर भिषण अपघात

Mumbai Accident : मुंबई हादरली! आधी महिलेवर अत्याचार केला, नंतर गळा आवळून संपवलं

MHADA Lottery: म्हाडाची ५३५४ घरं आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी कधी निघणार? वाचा वेळापत्रक

Heart Attack: तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढलंय? काय आहेत कारणे?

SCROLL FOR NEXT