chandrakant patil Saam Tv
मुंबई/पुणे

मी सामना वाचत नाही आणि दखल ही घेत नाही - चंद्रकांत पाटील

पंकजा मुंडे या भाजपाच्या प्रत्येक नेत्याची मुलगी आहे. त्यामुळे आम्ही काळजी घ्यायला समर्थ आहोत.

दिलीप कांबळे

मावळ - मी सामना वाचत नाही आणि सामनाची दखल देखील मी घेत नाही अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सामनाच्या रोखठोक मध्ये राज्यसभा निवडणुकांनंतर फडणवीस आणि भाजपवर (BJP) केलेल्या टीकास्त्रावर उत्तर दिले. तर दुसरीकडे  भाजपने विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांना डावलल्याबद्दलही सामनातून टोमणे मारण्यात आलेत.

हे देखील पाहा -

यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपा हे पंकजा मुंडे यांची काळजी घेण्यासाठी समर्थ आहेत. पंकजा मुंडे या भाजपाच्या प्रत्येक नेत्याची मुलगी आहे. त्यामुळे आम्ही काळजी घ्यायला समर्थ आहोत. बाकी कोणी त्यांची काळजी करण्याची गरज नाही अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सामनातून केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील नाचता येईना आंगन वाकड़ अशी टिका केली आहे. त्यांना पराभव आधी दिसला होता. त्यामुळे त्याची स्क्रिप्ट आधीच करण्यात आली होती. त्यानंतर सगळे त्या स्क्रिप्टनुसार बोलतात. त्यांच चांगल आहे की आपआपसात भांडण जरी असली तरी दिवसभर सगळे एकच वाक्य बोलत असतात. अशा शब्दत मवीआ सरकार वर त्यांनी टिका केली.चंद्रकांत पाटील हे देहू मध्ये चौदा तारखेला पंतप्रधान नरेंद मोदी येणार आहे. त्याची पाहणी करीत आले होते. दरम्यान मुख्य मंदिरात त्यांनी तुकाराम महाराज यांचेही दर्शन घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Independence Day Marathi Speech : १५ ऑगस्टला भाषण देताय? हे 10 मुद्दे लक्षात ठेवा; भाषण ऐकून सर्वच करतील कौतुक!

चोरांनी रात्री दुकान फोडलं, २२ किलो चांदी लंपास केली; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Crime News: पुण्यातील फेमस रीलस्टारला अटक; ५ हजारांहून अधिक बँक खात्यांतून १० कोटींचं मनी ट्रेल, हाँगकाँग कनेक्शन उघड

बीड पुन्हा हादरलं! पेट्रोलपंपाजवळ गोळीबाराचा थरार; वाल्मीक कराड कनेक्शन आलं समोर

Mumbai : पाणी टंचाईची कटकट संपली! मुंबईच्या तलावांमध्ये ८९.४९ टक्के पाणीसाठा, कोणते तलाव किती भरले? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT