Autorickshaw fare Hike Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईत रिक्षा-टॅक्सीच्या दरात पुन्हा भाडेवाढ; सर्वसामानांच्या खिशाला कात्री

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, रिक्षा टॅक्सीची दरवाढ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर

मुंबई - पुण्यानंतर आता मुंबईतही (Mumbai) रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. मुंबईत रिक्षाची दोन रुपयांनी तर टॅक्सीची तीन रुपयांनी भाडेवाढ होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीचे किमान भाडे अनुक्रमे 23 व 28 रुपये करण्यास मुंबई महानगर प्राधिकरणाकडून अखेर मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत येत्या शनिवारी म्हणजेच 1 ऑक्टोबर 2022 पासून रिक्षाचे (Auto Rickshaw) किमान भाडे 23 रुपये आणि टॅक्सीचे किमान भाडे 28 रुपये होणार आहे. रिक्षा टॅक्सी संघटनानी दिलेल्या संपाच्या ईशाऱ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सीएनजी गॅसच्या दरात वाढ होत आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात सीएनजी गॅसच्या दरात कपात केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने सीएनजी गॅसच्या दरात मोठी वाढ केली. सध्या सीएनजी गॅसचा दर 80 रुपयांच्या घरात पोहचला आहे. राज्यातील बहुतांशी रिक्षा-टॅक्सी या सीएनजी गॅस आधारीत आहेत. त्यामुळे या दरवाढीचा फटका रिक्षा-टॅक्सी चालकांना बसत होता.

मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा टॅक्सीचे सुधारित भाडे 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे. ऑटोरिक्षासाठी प्रवाश्यांना पहिल्या 1.5 किमीसाठी 21 वरून 23 रुपये मोजावे लागणार आहे तर टॅक्सीसाठी पहिल्या 1.5 किमीसाठी 25 वरून 28 रुपये मोजावे लागणार. कूल कॅब एसीसाठी आता नागरिकांना किमान भाडे (पहिल्या 1.5 किमीसाठी) 40 रुपये होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशात आधी रिक्षाचे किमान भाडे 21 रुपये आणि प्रत्येक किमीकरिता 14.20 रुपये, टॅक्सीचे किमान भाडे 25 रुपये प्रत्येक किमीकरिता 16.93 रुपये तर कूल कॅब एसीचे किमान भाडे 33 रुपये प्रत्येक किमीकरिता 22.96 रुपये होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लातूरमध्ये पावसाचा हाहाकार अनेकांचे संसार उघड्यावर; दोन गावांना पुरानं वेढलं, ७० शेळ्या, ७ बैल वाहून गेले

Heavy Rain : अकोला जिल्ह्याला पावसाने झोडपले; गावांमध्ये शिरले पाणी, वाडेगाव ते बाळापुर वाहतूक बंद

आर्थिक अडचण आलीय? UPI दूर करणार तुमची समस्या, बँकेत न जाता मिळेल Loan

Thane : मोठी बातमी! मंगळवारी पावसाचा रेड अलर्ट, ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी

INDIA Alliance vs Election Commission:मतचोरीचा वाद टोकाला! इंडिया आघाडी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आणणार महाभियोग, काय असते प्रक्रिया?

SCROLL FOR NEXT