Shivsena Vs Maha Vikas Aghadi Saam Tv
मुंबई/पुणे

औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना Vs कॉंग्रेस, राष्ट्रवादी; राजकीय संकटामध्येही मविआत मतभेद?

Shivsena Vs Maha Vikas Aghadi : राज्यात औरंगाबाद की संभाजीनगर यावरून गेल्या तीस वर्षांपासून औरंगाबादचं राजकारण केंद्रित आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: राज्यातील मविआ सरकार (MVA) कोसळण्याच्या उंबरठ्यावर असताना सरकारकडून अनेक निर्णय घेण्याचा सपाटा सुरू आहे. काल (मंगळवारी) मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचं आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर शिवसेना आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नाव बदलून संभाजीनगर (SambhajiNagar) करण्यात यावं असा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत मुख्यमंत्री आहेत अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. यामुळे शिवसेनेविरुद्ध राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये तीव्र मतभेद होण्याची शक्यता आहे. यामुळे आधीच कोसळण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मविआ सरकारचं भवितव्य आणखीनच धोक्यात आलं आहे. (MVA Government Latest News)

हे देखील पाहा -

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज बुधवारी कॅबिनेट मीटिंगमध्ये औरंगाबादचे नामांतर करुन संभाजीनगर करावे असा प्रस्ताव शिवसेनेकडून मांडला जाऊ शकतो. मात्र असा प्रस्ताव शिवसेनेनं आणल्यास त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षांकडूनच तीव्र विरोध करण्याची शक्यता आहे. या विरोधानंतरही मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला तर महविकास आघडीमध्ये तीव्र मतभेद होऊ शकतात अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai international Airport) दि. बा. पाटील यांचे नाव देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिपुत्रांना दिलं. मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नवी मुंबई येथील भूमिपुत्रांनी भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) हे आश्वासन दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत जी आर काढण्याचा संबंधच नसल्याचंही सांगितलं आहे.

राज्यात औरंगाबाद की संभाजीनगर यावरून गेल्या तीस वर्षांपासून औरंगाबादचं राजकारण केंद्रित आहे. शिवसेनेच्या (Shivsena) वतीने संभाजीनगरची हाक दिल्यानंतर पण सत्तेत आल्यानंतर संभाजीनगर नामकरण करणार असं आश्वासन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचेही दिसून आले. दुसरीकडे सरकारी पातळीवर अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. मात्र, आता राज्य सरकार कोसळण्याच्या स्थितीत असताना ठाकरे सरकार हा निर्णय घेण्यासाठी हालचाली करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

SCROLL FOR NEXT