Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

'उध्दव ठाकरे 'मविआ'च्या चक्रव्युहात अडकलेत, त्यांनी सरकारमधुन बाहेर पडावं'

विश्वभूषण लिमये

पुणे : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत, ते या महाविकास आघाडीच्या चक्रव्युहात अडकले आहेत त्यांनी या सरकारमधुन बाहेर पडावं असं आवाहन केंद्रीय सामाजिक राज्यन्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केलं. ते आज पुणे शहराच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना वरील वक्तव्य केलं.

देशात पाच राज्यांच्या निवडणुका होत असुन या पाचही राज्यात NDAला पुर्ण बहुमत मिळेल असा विश्वासही रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. मोदीच्या नेतृत्वाखाली सर्व अनुसुचित जाती मधील लोकांकरता मोदींनी (Narendra Modi) विविध योजना आणल्या त्याचा फायदा होत असुन पाचही राज्यात एनडीए सत्तेवर येईल. राज्यातील महाविकास आघाडीकडून विकासाची कामे होत नाही. आघाडी सरकारमधील नेते स्वत:चे प्रश्न सोडविताना दिसत असून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न ऐरणीवर आहेत.

उध्दव ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत, ते या महाविकास आघाडीच्या (MVA) चक्रव्युहात अडकलेत, उध्दव ठाकरे यांनी या सरकारमधुन बाहेर पडावे असे आवाहन आठवले यांनी ठाकरेंना केल आहे. सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकार सरकारी संस्थाचा आधार घेत नसल्याचही ते य़ावेळी म्हणाले.

दरम्यान युक्रेन (Ukraine) येथील परिस्थतीबाबत केंद्र सरकार गंभीर पणे काम करत आहे. त्यामुळे विरोधकांनी अशा गोष्टीवर राजकारण करण्यापेक्षा सरकारला सहकार्य करुन युक्रेन मधील देशबांधवाना परत आपल्या देशात आणले पाहिजे असं मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केल.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cow Bike Riding Video: सगळं काही शक्य! गायीने केली बाईक रायडिंग, VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

PM मोदींनी चार टप्प्यांत 270 चा जागांचा टप्पा ओलांडला, अमित शहा यांचा दावा

Eggs : उकडलेली अंडी किती दिवस टिकतात?

Singham Again Shooting In Jammu : 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फायटिंगचा सीन व्हायरल; अजय- जॅकी एकमेकांना भिडले...

SRH vs PBKS: अखेरच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांची बॅट तळपली! हैदराबादसमोर विजयासाठी २१५ धावांची गरज

SCROLL FOR NEXT