Ashok Chavan Saam tv
मुंबई/पुणे

Political Explainer : अशोक चव्हाण भाजपसाठी इतके महत्वाचे का आहेत? जाणून घ्या कारणे?

Ashok chavan Latest News: अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होत आहे. भाजपसाठी अशोक चव्हाण इतके महत्वाचे का आहेत, तसेच अशोक चव्हाण यांच्यासाठी भाजप महत्वाची का आहे? जाणून घेऊयात

Vishal Gangurde

सूरज मसुरकर, मुंबई

Ashok Chavan News:

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होत आहे. भाजपसाठी अशोक चव्हाण इतके महत्वाचे का आहेत, तसेच अशोक चव्हाण यांच्यासाठी भाजप महत्वाची का आहे? जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

भाजपासाठी अशोक चव्हाण महत्त्वाचे का आहेत?

1. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा होत आहे. अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली तर काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणात फोडली जाऊ शकतात. ही मते फोडल्यामुळे राज्यसभेला भाजपचा अतिरिक्त उमेदवाराचा विजय होईल. तसेच यामुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल.

याआधी भाजपने हा प्रयोग विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत करून पाहिला आहे. प्रसाद लाड विधानपरिषद उमेदवार आणि धनंजय महाडिक राज्यसभा उमेदवार यांना उभं करून भाजपने महाविकास आघाडीची मते फोडण्यात यशस्वी झाली होती. आता देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी मत फुटली तर महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल.

2. अशोक चव्हाण यांच्या रूपात एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेता मराठवाड्याला मिळाल्या कारणामुळे भाजपाची मराठवाड्यातील ताकद वाढेल.

3. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांचा सारखा दिग्गज नेता गळाला लागला, तर काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करून आणखी आमदार काँग्रेसचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडले जाऊ शकतात.

अशोक चव्हाण यांच्यासाठी भाजप का महत्त्वाची ?

1. नांदेडमध्ये चार साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाप्रकरणी आयकर विभागाची चौकशी सुरू होती, यामध्ये अशोक चव्हाण यांच्या निकटवर्तीयांची देखील चौकशी सुरू होती. भाजप प्रवेशामुळे कदाचित ही चौकशी थांबू शकते.

2. भाजपा प्रवेशामुळे अशोक चव्हाण यांना एक ज्येष्ठ नेते म्हणून मराठवाड्यामध्ये एक वेगळी स्पेस मिळू शकते.

3. चव्हाण यांना मुख्यमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री म्हणून अनुभव असल्या कारणामुळे भाजपच्या मंत्रिमंडळात चांगली जबाबदारी मिळू शकते.

4. भाजपमुळे अशोक चव्हाण यांना नांदेडचा बालेकिल्ला अबाधित राखता येईल.

5. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, त्या अर्थी येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीतून राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

SCROLL FOR NEXT