Ulhasnagar Crime Saam Tv
मुंबई/पुणे

गुन्हा मागे घेण्याचा वाद; उल्हासनगरात दोन तरुणांवर भररस्त्यात चाकू हल्ला!

संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

अजय दुधाने

अजय दुधाने

उल्हासनगर: भररस्त्यात दोन तरुणांवर चाकू हल्ला झाल्याची घटना उल्हासनगर शहरात घडलीय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यातील तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

उल्हासनगर कॅम्प-3 मधील कमला नेहरू नगर येथे राहणारा श्रीकांत सिंग आणि पियुष राय हे तरुण रविवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास कॅम्प नंबर-1 येथील झुलेलाल मंदिर चौकात आईस्क्रीम खाण्यासाठी गेले. त्यावेळी तिथे बबलु जे. डी., नितीन अहिरे, सुरज बेहनवाल हे तिथे आले. तेव्हा बबलु जे. डी. हा श्रीकांत सिंग याला म्हणाला, मनीषला बोल जुनी केस मागे घ्यायला बोल, त्यावरून श्रीकांत त्याला म्हणले की, त्याचा तो बघेल मी त्याला का सांगु.

या सर्व प्रकारचा राग मनात धरून त्या तिघांनी श्रीकांतला दगड व विटांनी मारण्यास सुरवात केली. तेव्हा त्यापैकी सुरज बेहनवाल याने धारधार चाकूने श्रीकांतवर गंभीर वार केले. यावेळी श्रीकांतला वाचविण्यासाठी पियुश राय मध्यस्थी गेला तर पियुश राय याच्या मनगटाला वार करण्यात आले.

हे देखील पाहा-

जखमी श्रीकांत आणि पियुष यांच्यावर कळवा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात बबलु जे. डी., नितीन अहिरे, सुरज बेहनवाल यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत या करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT