Tulsi Lake Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level Today : मुंबईकरांची तहान भागवणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो; इतर धरणांमध्ये किती पाणीसाठा उपलब्ध?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : मुंबईची तहान भागवणाऱ्या धरण क्षेत्रात मागील दोन दिवसात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

मुंबईला ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी तुळशी तलाव हा आज मध्यरात्री ओसंडून वाहू लागला आहे. मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी यंदाच्या पावसाळ्यात भरुन वाहू लागलेला हा पहिलाच तलाव ठरला आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण ही ८०४.६० कोटी लीटर इतकी आहे.  (rain

गेल्या वर्षी हा तलाव १६ जुलै रोजीच भरुन वाहू लागला होता. तर २०२० मध्ये २७ जुलै; २०१९ मध्ये १२ जुलैला हा तलाव ओसंडून वाहू लागला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर इतकी असून आज पहाटे ६ वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये ५७,३३४ कोटी लिटर म्हणजेच ३९.६१ टक्‍के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. (Maharashtra News)

कोणत्या तलावात किती जलसाठा?

  • अप्पर वैतरणा तलावात ३,३६०.५० कोटी लीटर

  • मोडक-सागर तलावात ८,१२१.४ कोटी लीटर

  • तानसा तलावात १०३०३.१ कोटी लीटर

  • मध्य वैतरणा जलाशय ९८०९.५ कोटी लीटर

  • भातसा तलावात २३,१९२ कोटी लीटर

  • विहार तलावात १७४२.७ कोटी लीटर

  • तुळशी तलावात ८०४.६ कोटी लीटर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT