महिला शिक्षणाची ज्योत पेटवणारा महाराष्ट्र.....महिलांसाठी आरक्षणाची कवाडं उघड करणारा पुरोगामी महाराष्ट्र.... मात्र याच महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला पैशांसाठी हपापलेल्या राजकीय पुढाऱ्यांनी सुरुंग लावलाय...अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुढारी असलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्याच्या कुटुंबियांनी हुंड्यासाठी केलेल्या छळामुळेच वैष्णवीचा मृत्यू झालाय... 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, साडेसात किलो चांदीची भांडी एवढंच नाही तर कोट्यावधीची उधळण करुनही कस्पटे कुटुंबियांच्या हाती फक्त वैष्णवीचा मृतदेह आणि आयुष्यभरासाठीचं दुःखच आलंय... त्यामुळेच राजकीय नेत्यांच्या घरात चाललंय काय? असा प्रश्न निर्माण झालाय...
असा छळ होत असेल तर महाराष्ट्र कुठे चाललाय, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. राजकीय नेते म्हणजे राज्याला दिशा देणारे नेतृत्व मानलं जातं... मात्र बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देणाऱ्या पक्षाचेच माजी खासदार रामदास तडस यांच्या सुनेनं छळाचे गंभीर आरोप केलेत.
महाराष्ट्रातील राजकीय पुढाऱ्यांकडून महिलांची होणारी कौटुंबिक छळाची मालिका इथेच थांबत नाही... तर या छळात महिला नेत्याही आढळून आल्यात....
एवढंच नाही तर धनंजय मुंडे यांच्यावरही करुणा मुंडेंनी घरगुती हिंसाचाराचा आरोप केलाय.. या प्रकरणी वांद्रे न्यायालयाने धनंजय मुंडेंना दोषी ठरवलंय... तर दुसरीकडे महाराष्ट्रात वर्षाला सरासरी 45 हजार महिला घरगुती हिंसाचाराच्या शिकार होत असल्याचं चित्र आहे..
त्यामुळे खादीच्या आत लपलेले बगळेच लाडक्या बहीणींचे शिकारी आहेत... खरंतर नेत्यांचा आदर्श कार्यकर्ते घेत असतात.. मात्र नेतेच जर महिलांचा सन्मान ठेवत नसतील तर कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा करणार.... त्यामुळेच आता राजकीय नेत्यांनी स्वतःच्याच मनात खोलवर डोकावण्याची आणि अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे.....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.