Jalna Latest News: जालना शहरातून तीन लहान मुलं बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली आहे.15 वर्षीय अंकित जाधव, 14 वर्षीय स्वराज मापारी आणि 14 वर्षीय हर्षद देवकर अशी बेपत्ता झालेल्या तिन्हीही मुलांची नावं आहेत.
ही तिघंही मुलं जुना जालना भागातील सिंचन वसाहत भागातून गायब झाली असून तिघांनाही अज्ञाताने स्कुटीवर बसवून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार कदीम जालना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत.
दरम्यान, बेपत्ता झालेल्या मुलांपैकी अंकित याने जाण्यापूर्वी घराच्या दरवाजावर चिट्ठी लिहून ठेवलीय. "मम्मी -पप्पा तुम्ही हे लेटर वाचेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका'', असं अंकितने चिट्ठीत लिहून ठेवलंय.
तर स्वराज मापारी याने त्याच्या स्नॅपचॅटवरून मॅसेज करून मी जिथे आहे तिथे ठीक आहे. सक्सेसफुल झाल्यानंतर परत येईन, असा मॅसेज ठेवलाय. (Latest Marathi News)
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी मिसिंग तक्रार दाखल केली असून दोन पथकं मुलांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.