Barsu Refinery Project Protest Explainer: बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन आंदोलक आक्रमक झाले आहेत. आज या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली असता आंदोलकांनी याचा तीव्र विरोध केला.
यानंतर परिस्थिती चिघळली असता पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. यामध्ये दोन आंदोलक जखमी झाल्याची माहिती आहे. स्थानिकांचा या प्रकल्पाला इतका विरोध का आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. (Breaking Marathi News)
भारत सरकारला महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर एक मेगा ऑइल रिफायनरी प्रकल्प उभारायचा आहे. २०१५ मध्ये, 'रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड' प्रकल्प रत्नागिरी, महाराष्ट्र येथे बांधला जाईल, अशी घोषणा करण्यात आली.
यापूर्वी हा प्रकल्प रत्नागिरीतील नाणारमध्ये बांधण्यात येणार होता. मात्र शिवसेना आणि स्थानिक लोकांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होता.
पुढे महाविकास आघाडीचे सरकार आपल्यानंतर हा प्रकल्प नाणारऐवजी बारसू-सोलगावमध्ये (Barsu Refinery Project) उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला. शासनाच्या संमतीनंतर पुन्हा हा प्रकल्प होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र येथेही या प्रकल्पला स्थानिक विरोध करत आहे. येथे हा प्रकल्प होऊ नये म्हणून स्थानिक नागरिक मागील पाच दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
या प्रकल्पामुळे देशातील आणि महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसेच हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असल्याचं, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. असं असतानाही स्थानिक या प्रकल्पाला का विरोध करत आहे? असा प्रश्नही अनेकांना पडला असेल.
स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की, या प्रकल्पामुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होणार. त्यांची फळझाडे नष्ट होतील, रिफायनरीतून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्यामुळे नद्यांचे पाणी प्रदूषित होईल, त्याचा थेट परिणाम मासेमारी व्यवसायावर होणार असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. यामुळेच स्थानिक नागरिक या प्रकल्पाला मोठा विरोध करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.