nandurbar, water supply saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदूरबारला पाणीटंचाईचे संकट, शहरवासियांना हाेणार तीन दिवसाआड पाणीपुरवठा; पालिकेचा निर्णय

नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन प्रशासनाने नंदूरबारकरांना केले आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar Water Supply News : नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणात अवघ्या 32 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर पिण्यायोग्य 25 टक्के पाणीसाठा राहिला आहे. त्यामुळे आजपासून (साेमवार) तीन दिवसाआड पाणीपुरवठा नंदुरबार शहराला केला जाणार आहे. (Maharashtra News)

विरचक धरणामध्ये 90 दिवस पुरेल एवढाच जलसाठा राहिला आहे. पावसाळा सुरु होऊन जवळपास तीन महिन्याच्या कालावधीत उलट आला तरी देखील जिल्हा समाधानकारक असा पाऊस होत नसल्यामुळे मोठा अडचणीच्या सामना आता नागरिकांना करावा लागणार आहे.

नंदूरबार जिल्ह्यात सरासरी 40 टक्के पाऊस झालेला आहे. त्यामुळे पाण्याची बचत शहरवासीयांना करावी लागणार आहे. आगामी काळात पाऊस आला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. परंतु पाऊस आला नाही तर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन अमोल बागुल (मुख्याधिकारी) यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माजी मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Sanitizer Disadvantage : प्रवासात सॅनिटायझर वारंवार हाताला लावताय? वेळीच व्हा सावध! अन्यथा

वही आणायला १० रुपये मागितले तर पप्पा...; शेतकऱ्याच्या लेकीची व्यथा, रोहित पवारही भावूक, पाहा, VIDEO

पाकिस्तान तोंडघशी! पहलगामचे फोटो TRF ने पोस्ट केले, दुसऱ्यांदा जबाबदारी स्वीकारली, UNSC च्या रिपोर्टमध्ये दावा

Mumbai To Akola: मुंबईहून अकोल्याला पोहोचण्याचे सर्वोत्तम मार्ग कोणते? प्रवासाचे टॉप ५ पर्याय आणि टिप्स

SCROLL FOR NEXT