rohit pawar google
महाराष्ट्र

Rohit Pawar: ...तर आम्ही राजीनामा देऊ; आमदार रोहित पवार आक्रमक, EVM वरून राजकारण तापलं!

Rohit Pawar: निवडणूक बॅलेट पेपरवर घेता येणार शक्य नसेल तर सरकारने हायब्रीड पद्धत आणावी.

Dhanshri Shintre

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. भाजपाने १३२ जागा जिंकल्या आहेत. मात्र, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला फक्त ४६ जागांवर विजय मिळवता आला आहे. महाराष्ट्रातील हे निकाल पाहून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांतील नेते निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीनविरोधात प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. अशातच रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सोलापुरातील माळशिरसमध्ये मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला आणि ईव्हीएमची सत्यता तपासण्यासाठी थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव केला. या घटनेनं राज्यसह देशभरात मारकडवाडी चर्चेच्या केंद्रस्थानी आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यातील डेक्कन जिमखान्यावर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. राजकारणातील धकाधकीतून वेळ काढत रोहित पवार क्रिकेट खेळण्यात रंगले होते. क्रिकेटचा इनिंग नंतर रोहित पवार यांनी महायुती सरकारला ईव्हीएम वरून टोले लगावले आहेत.

क्रिकेट पारदर्शी खेळ आहे. क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर असतो. ईव्हीएममध्ये मात्र तशी कोणतीच पद्धत नाही, त्यामुळे हे सरकार ईव्हीएम सरकार आहे. ईव्हीएमच्या विरोधात आम्ही सर्व पातळ्यांवरती आमचा लढा सुरू ठेवणार आहोत. ईव्हीएमच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेलो, तरी सुप्रीम कोर्टावर ही विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचा निर्णय दुसरं सरकार आलं तरी अद्यापही सुप्रीम कोर्टाने दिलेला नाही असे रोहित पवार म्हणाले.

राम सातपुते यांच्या बोलण्याला आराध्या नाही, विकास काम करणे आणि लोकांची जवळीक असणार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. उत्तम जानकर एक लाख मतांनी निवडून येणार होते. मात्र त्यांना पराभूत करण्याचे सर्व प्रयत्न करूनही ते विजयी झाल्यामुळे राम सातपुते असं बोलत आहेत. बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार असल्यास आम्ही राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जायला तयार आहोत. मात्र ती हिम्मत माहितीमध्ये नाही त्यामुळे ते यासाठी तयार होणार नाहीत असेही रोहित पवार म्हणाले.

आयकर विभागाने क्लीनचीट दिल्याबद्दल मी अजित पवार यांचे अभिनंदन करतो. निवडणूक बॅलेट पेपरवर घेता येणं शक्य नसेल तर सरकारने हायब्रीड पद्धत आणावी. ज्यांना इच्छा आहे त्यांनी ईव्हीएमवर मतदान करावे, ज्यांना इच्छा आहे त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान करावे असे रोहित पवार यांचे वक्तव्य केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

SCROLL FOR NEXT