UNIQUE VAT PURNIMA RITUAL: WOMAN HANGS LIQUOR BOTTLES ON BANYAN TREE TO HELP HUSBAND QUIT DRINKING saam tv
महाराष्ट्र

नवऱ्याचं दारूचं व्यसन सोडवण्यासाठी वडाच्या झाडाला महिलेनं बांधल्या दारूच्या बाटल्या

Vat Savitri Purnima : छत्रपती संभाजीनगरमध्ये वटपौर्णिमेनिमित्त एका महिलेने नवऱ्याचे दारूचे व्यसन सुटावे या प्रार्थनेसाठी वडाच्या झाडाला दारूच्या बाटल्या बांधल्या. यामुळे ही वटसावित्री पोर्णिमा चर्चेत आली आहे.

माधव सावरगावे, औरंगाबाद

  • महिलेने वटपौर्णिमेला नवऱ्याचे दारूचे व्यसन सुटावे म्हणून वडाच्या झाडाला दारूच्या बाटल्या बांधल्या.

  • पारंपरिक वटसावित्री पूजेला वेगळा सामाजिक संदेश देणारी घटना

  • महिलेने पतीच्या दीर्घायुष्यासोबतच व्यसनमुक्त जीवनासाठी प्रतीकात्मक प्रार्थना केली.

पतीदेवाच्या दीर्घआयुष्यासाठी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाला प्रदिक्षणा घालून नवऱ्यासाठी वरदान मागतात. त्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी ते व्रत पाळत असतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र एका महिलेनं वेगळ्याच प्रकारची वटसावित्री पोर्णिमा साजरी केली. नवऱ्याला असलेलं दारूचं व्यसन सोडवण्यासाठी महिलेनं चक्क वडाच्या झाडाला दारूच्या बाटल्या लटकवल्या.

महिलेनं छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात वडाच्या झाडाला दारूच्या बाटल्या लटकवून वटपौर्णिमा साजरी केली. वटपौर्णिमा साजरी करताना त्या महिलेने माझ्या नवऱ्याची दारू सोडवा अशी विनवणी पोलिसांना केली. लग्नाला तब्बल २५ वर्षे झाली, पण नवऱ्याच्या दारूच्या व्यसनामुळे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याची वेदना एका महिलेने अनोख्या पद्धतीने व्यक्त केली.

नवऱ्याने दारू कायमची सोडावी, या आशेने तिने वडाच्या झाडालाच चक्क दारूच्या बाटल्या बांधत वटपौर्णिमेची पूजा केली. या अनोख्या कृतीची क्रांती चौकात पोलिसांची तारांबळ उडाली. काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांचे होणारे नुकसान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पोलिसांनी विनवणी करून त्या महिलेला बाजूला केले.

बाभुळगाव बुद्रूक येथे महिलांचा अनोखा उपक्रम

​नाशिकच्या येवला तालुक्यातील बाभुळगाव बुद्रूक येथे वटपौर्णिमेचे औचित्य साधून महिलांनी एक स्तुत्य व आदर्श उपक्रम राबवला. सामाजिक कार्यकर्त्या निर्मला भालेराव यांच्या पुढाकाराने गावातील महिलांनी एकत्र येत पारंपरिक सण साजरा करण्यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्मशानभूमीत वृक्षारोपण केले.

​वटपौर्णिमेनिमित्त निर्मला भालेराव यांनी गावातील महिलांना एकत्र केले. याप्रसंगी महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून पारंपरिक पद्धतीने उखाणे घेतले. या आनंदी वातावरणात महिलांनी केवळ धार्मिक विधी न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचे ठरवले. त्यानुसार गावातील स्मशानभूमीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नसरापूरच्या नराधमाला फाशीची शिक्षा, अवघ्या 60 दिवसांत खटला निकाली

Maharashtra News Live Update: शिवसैनिकांडून चोरट्याविरोधात "ऑपरेशन तुडवा "...

म्हणे हे ‘लोकप्रतिनिधी’! महापालिकेत सत्ताधारी नगरसेवकांमध्येच शिवीगाळ, शहराचा विकास कसा करणार?

Petrol-Diesel: सरकारकडून पेट्रोल आणि डिझेल खरेदीच्या नियमात बदल, काय आहेत नवीन नियम?

Milk : तुमच्या दुधातही भेसळ आहे? 'या' ५ सोप्या पद्धतीने घरच्या घरी तपासा

SCROLL FOR NEXT