vashi villagers morcha at nagar panchayat demands regular water supply  Saam Digital
महाराष्ट्र

Dharashiv : वाशी नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा, संतप्त महिलांचा ठिय्या;गेले अधिकारी कुणीकडे?

vashi villagers morcha at nagar panchayat office : गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील विविध गावांत पाण्याची कमतरता भासू लागली आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा व नागरीकांचे होणारे हाल थांबविण्याच्या मागणीसाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला. या माेर्चा महिला माेठ्या संख्येने सहभागी झाल्या हाेत्या.

वाशी येथे नगरपंचायत मार्फत करण्यात येणारा पाणी पुरवठा हा सुरळीत नाही. त्यामुळे टॅंकरचा आधार नागरीकांना घ्यावा लागत आहे. परिणामी आर्थिक बाेजा नागरिकांवर पडत आहे. तसेच अनेकांना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे संतप्त झालेल्या स्वराज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला. यावेळी महिलांनी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान आंदाेलकांचे गा-हणे ऐकण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे फोनद्वारे संबधितांना पाणी सुरळीत करण्याची मागणी आंदाेलकांना करावी लागली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism: स्वर्गापेक्षाही सुंदर आहेत पनवेलमधील हे Hidden Spots; न्यू ईअरचा प्लान बनेल परफेक्ट

रशियाचे राष्ट्रपती Vladimir Putin यांच्या घरावर ड्रोन हल्ला, युद्ध पुन्हा भडकणार?

Maharashtra Live News Update : अकोला महापालिकेत 'भाजप-राष्ट्रवादी' युतीची घोषणा

BMC Election: मुंबई महापालिकेतील महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला, शिंदेसेना ९० जागा तर भाजपला १३७ जागा

Congress-Vanchit Alliance: काँग्रेस वंचित युती, वर्षा गायकवाड नाराज? गायकवाडांनी नाराजीनाट्यावर सोडलं मौन

SCROLL FOR NEXT