mp udayanraje bhosale, satara, satara water cut news
mp udayanraje bhosale, satara, satara water cut news saam tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News : तुम्हांला वठणीवर आणायला वेळ लागणार नाही : उदयनराजे भाेसले

Siddharth Latkar

Satara News : गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरातील पश्चिम भागात दूषित पाणीपूरवठा हाेत असल्याचे कारणास्तव सातारा (satara) पालिकेच्या प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (ता. 18) ढाेणे काॅलनी, मंगळवार पेठेतील नागरिकांनी माेर्चा काढत माेती चाैकातील वाहतुक राेखून धरली. आता या आंदाेलनाची दखल खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी देखील घेतली असून नागरिकांच्या भावनांशी आणि त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सहन करून घेतला जाणार नाही असा इशारा राजेंनी (udayanraje latest news) पालिका प्रशासनाला दिला आहे. (Maharashtra News)

खासदार उदयनराजे भाेसले यांनी पत्रकाद्वारे पालिका प्रशासनास सुनावले आहे. स्वच्छ व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शहराच्या पश्‍चिम भागाला अशुद्ध, अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असेल तर ते अत्यंत क्लेशदायी आहे. नागरिकांच्या भावनांशी व जिवाशी खेळण्याचा प्रकार सहन करून घेतला जाणार नाही असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

पाणीपुरवठ्याच्या वितरण पद्धतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने सुधारणा करावी. ज्यांना काम जमत नसेल तर त्यांनी तातडीने आपली बदली करून घ्यावी असेही उदयनराजेंनी त्यांच्या म्हटलं आहे.

शहराच्या पश्‍चिम भागात गेल्या तीन महिन्यांपासून रामाचा गोट, मंगळवार पेठ भागात दूषित पाणीपुरवठ्याबाबत सातारा विकास आघाडीने प्रशासनाला सूचनाही केल्या होत्या. परंतु प्रशासन गेंड्याची कातडी पांघरून बसले असेल तर अशा अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वठणीवर आणायला वेळ लागणार नाही असे राजेंनी त्यांच्या पत्रकात नमूद केले आहे.

स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा हा नागरिकांचा हक्क आहे. कास धरणाची उंची वाढवण्यात आली आहे, धरणापासून नवीन अतिरिक्त जलवाहिनीदेखील मंजूर करण्यात आली आहे. पश्‍चिम भागातील पाणीपुरवठ्याबाबत माहिती घेतली असता फिल्टर केलेले पाणी सोडण्याऐवजी डेड स्टॉकमधील पाणी संबंधित कर्मचाऱ्यांनी सोडल्याने निदर्शनास आले आहे.

त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करा अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे. पाणीपुरवठ्याच्या वितरण पद्धतीत अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने सुधारणा करावी. ज्यांना काम जमत नसेल तर त्यांनी तातडीने आपली बदली करून घ्यावी. शहराच्या पश्‍चिम भागातील अपुरा व शुद्ध पाणीपुरवठा तत्काळ थांबवा. शुद्ध आणि अधिक दाबाने पाणी द्या, असेही राजेंनी म्हटले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

SCROLL FOR NEXT