Weather Updates  Saam TV
महाराष्ट्र

Weather Update : या १२ जिल्ह्यात किरकोळ पावसाचा अंदाज, २४ जिल्ह्यात पावसाची विश्रांती, वाचा हवामान अंदाज

Maharashtra Rain Update : आज राज्यात किरकोळ पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. काही ठिकाणी थंडीची चाहूल लागली आहे.

Namdeo Kumbhar

Weather Update In Marathi : भाऊबीजेला राज्यात मिश्र वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. १२ जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह किरकोळ पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर २४ जिल्ह्यात स्वच्छ, कोरडे वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नोव्हेंबर महिना सुरु झाला तरी पावसाची रिपरिप काही ठिकाणी सुरुच आहे, त्यामुळे उकाडा प्रचंड वाढला आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात वातावरणात गारवा वाढलाय. त्यामुळे थंडीची चाहूल लागली आहे.

आज कसं असेल वातावरण?

राज्यात आज मिश्र वातावरण राहील, असा अंदाज वर्तवलाय. मुंबई, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात आज आभाळ कोरडे राहण्याची शक्यत आहे. पण रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड येथील १२ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित किरकोळ पावसाचा अंदाज वर्तवलाय.राज्यातील उर्वरित २४ जिल्ह्यात केवळ स्वच्छ वातावरण जाणवेल, असे हवामान विभागाने सांगितलेय.

ऑक्टोबर हिटपासून दिलासा कधी ?

नोव्हेंबर महिना सुरु झाला, पण उकाडा काही गेला नाही. ऑक्टोबर हिटमुळे नागरिक त्रस्त आहेत. पण राज्यात लवकरच थंडीची चाहूल लागू शकते. सध्या पश्चिम महाराष्ट्रात काही प्रमाणात थंडीची चाहूल लागली आहे. वातावरणात गारवा आला आहे. मुंबई, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील कमाल तापमानातही घट झाली आहे. ४ नोव्हेंबरपासून राज्यात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात थंडी कमीच असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये कडाक्याची थंडी जाणवण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही; एकनाथ शिंदे यांचं आश्वासन|VIDEO

Maharashtra Farmers : हातातोंडाशी आलेला घास पाण्यात, शेतातील कपाशीचं पीक वाया; शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

Maharashtra Live News Update: गेवराईत 3 एकर बागायती जमीन गेली वाहून

Kalyan: कामावर गेला पण परत आलाच नाही, हाय टेन्शन वायरला स्पर्श; विजेचा झटका लागून तरुणाचा जागीच मृत्यू

Pandharpur News: पंढरपूरमध्ये शासकीय धान्याचा काळाबाजार उघड – दोन ट्रक जप्त|VIDEO

SCROLL FOR NEXT