विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. यातच महाविकास आघाडीत काही जागांवरून अजूनही तिढा कायम आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याचे कारण म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी एकाच जागेवरून आपआपले उमेदवार जाहीर केले आहेत. दोन्ही पक्षाने एकाच जागेवरून आपले उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचं चित्र आहे.
अलीकडेच शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये ठाकरे गटाकडून परांडा विधानसभा मतदारसांघात रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. यातच आता शरद पवार गटाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. ज्यात त्यांनी परांडा विधानसभा मतदारसांघात राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यातच आता परांडामध्ये ठाकरे गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढत पाहायला मिळणार आहे.
परांड्यातून शरद पवार गटाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे उमेदवार रणजित पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''माझी सामनामधून उमेदवारी त्यांनी (तघकारे गटाने) जाहीर केली आहे. त्यामुळे कुठलाही संभ्रम नाही. मी सोमवारी माझा उमेदवारी राज दाखल करणार आहे.'' 'साम टीव्ही'शी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
मैत्रीपूर्ण लढतीसाठी तुमची तयारी आहे का? असं त्यांना रणजित पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, आमचे पक्षप्रमुख उद्धव तटकरे हे जे नैर्णय घेतील, तो मी मेनी करेल, असं ते म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.