Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shiv Sena Hearing Supreme Court Live Saam Tv
महाराष्ट्र

Udhav Thackeray Vs Eknath Shinde: सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली; पाहा दोन्ही गटाचे युक्तीवाद....

आजच्या सुणावणीत ठाकरे गटाने सकाळच्या सत्रात युक्तीवाद केला, तर दुपारच्या सत्रात शिंदे गटाकडून युक्तीवाद करण्यात आला....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi: शिवसेनेच्या सत्तासंघर्षाची लढाई सध्या सुप्रीम कोर्टात सुरु असून आजच्या दिवसाची सुणावणी संपली आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या सत्ता संघर्षात कुणाचा विजय होणार, हा निकाल येत्या काही दिवसातच लागणार आहे. यावेळी ठाकरे गटाकडून आज सकाळच्या सत्रात युक्तीवाद केला. तर दुपारच्या सत्रात शिंदे गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. (Maharashtra Political Crisis)

ठाकरे गटाचा युक्तीवाद..

आजच्या सुणावणीमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपने सरकार बनवण्यासाठी राज्यपालांनी नियमांच्या कक्षा ओलांडून त्यांना मदत केली. असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वकिलांकडून करण्यात आला. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटाने नेमलेले पक्ष प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीदेखील बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद करण्यात आला. ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी हा युक्तिवाद केला.

ठाकरे गटाचे तिसरे वकील देवदत्त कामत युक्तिवाद करताना आपण प्रतोदाच्या नियुक्तीबाबत मुद्द्यावर युक्तिवाद करणार असल्याचं देवदत्त कामत यांनी सरन्यायाधीशांना सुरुवातीलाच निदर्शनास आणून दिले. यात शिंदे गटाकडून लेटरपॅडवर शिवसेना विधीमंडळ पक्ष असा उल्लेख केला गेला असल्याचं देवदत्त कामत यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.

शिंदे गटाचा युक्तीवाद...

दुपारच्या सत्रात शिंदे गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. यामध्ये आमदारांनी जे निर्णय घेतले, ते विधिमंडळातील सदस्यांच्या बहुमताने घेतले आहेत. त्यामुळे हे निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द करू नये, अशी मागणी नीरज कौल यांनी केली. तसेच नबाम रबिया केसमध्ये आमदारांच्या जीवाला धोका होता. तसे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करू नये, अशी मोठी मागणी शिंदे गटाच्या वकिलांमार्फत करण्यात आली.

यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांना असलेला पाठिंबा काढला. त्यामुळेच राज्यपालांनी पक्षात फूट आहे, असे मानले. ठाकरेंवर विश्वास नाही, असे आमदार म्हणाले. त्यामुळेच बहुमत चाचणीचा निर्णय राज्यपालांनी घेतला. बहुमत चाचणी घेणं, हे राज्यपालांचं कर्तव्यच आहे, असं वक्तव्य नीरज कौल यांनी केलं. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT