औरंगाबाद : राज्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाने आणखी एक धक्का दिला आहे. गेल्या पावणेदोन महिन्यातील संपामुळे झालेलं महामंडळाचं नुकसान भरून काढण्यासाठी आता कर्मचाऱ्यांकडून वसूल केलं जाण्याची शक्यता आहे. २ महिन्यापासून पगार नाही अशात महामंडळाने नवा घाट घातल्याने कर्मचाऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.
विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असलेले राज्य भरातील एसटी आता पुन्हा एकदा संकटात सापडतील अशी शक्यता आहे. कारण एकतर कर्मचारी एसटी संपात (ST Strike) सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. आता गेल्या पावणेदोन महिन्यात झालेलं महामंडळाचं नुकसानही कर्मचाऱ्यांकडून वसूल केलं जाणार आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील पगारातून महामंडळाचे नुकसान वसूल करण्याचा 'घाट' महामंडळाने घातला असून याबाबतचे आरोपपत्र संपकरी कर्मचाऱ्यांना देण्यास महामंडळाने सुरुवात केली आहे. आधीच सरकारने आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची कारवाई केली. त्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक धक्का आहे.
औरंगाबाद (Aurangabad) शहरातील सिडको आगार क्रमांक १ येथील वाहक उल्हास चव्हाण यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यात आगाराचे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले असून त्याला आपण जबाबदार आहात, असे लिहिण्यात आले आहे. एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांकडून आर्थिक नुकसान झाल्यास त्यांच्या पगारातून नुकसानभरपाई वसूल केली जाते. संपकरी कर्मचाऱ्यांना आरोपपत्रावर आपली बाजू मांडण्यासाठी १५ दिवसांचा वेळ संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला आहे, असे महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
संपामुळे एसटी नुकसानाला कर्मचारी जबाबदार असल्याचा ठपका आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. शिवाय आंदोलनात पुढाकार घेत अन्य कर्मचाऱ्यांना चिथावणी दिलीय असही सांगण्यात आलं आहे. शिवाय कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला संपकरी कर्मचारी जबाबदार आहात, असा मजकूर आल्यानं कर्मचारी पुन्हा संतापले आहेत.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.