नागपूर - अमरावती जिल्ह्यातील हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी त्यांच्याविरुध्द दाखल एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला आहे.
हे देखील पहा -
दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली असा आरोप आहे. दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते.
या प्रकरणात अमरावती जिल्ह्यातील धारणी पोलिसांनी रेड्डी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त करणे व इतर विविध गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदवीला होता. उच्च न्यायालयाने केवळ रेड्डी यांच्याविरुद्धचा एफआयआर रद्द केला आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.