Onion Price Saam tv
महाराष्ट्र

Onion Price : तर येत्या निवडणुकीत 'नोटा'वर शिक्का; कांद्याला हमीभाव नसल्याने शेतकऱ्यांचा इशारा

Solapur News : मागच्या काही महिन्यांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियोजन कोलमडल्याने कांदा लिलावाला आठवड्यातून तीन ते चार वेळा सुट्ट्या द्याव्या लागत आहेत.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लावल्याने शेतकऱ्यांचे दिवसेंदिवस हाल होत आहेत. तसेच यंदा कांद्याचे (Solapur) उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने कांद्याचे भाव कोलमडत आहेत. यामुळे कांदा (Onion) उत्पादक शेतकरी आक्रमक झाला असून कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये 'नोटा'वर शिक्का मारणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी सत्ताधारी व विरोधकांना दिला आहे. (Live Marathi News)

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा महाराष्ट्रातली कांद्याला योग्य भाव देणारी (Bajar Samiti) बाजार समिती म्हणून त्याचा नावलौकिक आहे. मात्र मागच्या काही महिन्यांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियोजन कोलमडल्याने कांदा लिलावाला आठवड्यातून तीन ते चार वेळा सुट्ट्या द्याव्या लागत आहेत. त्याच सामान्य शेतकरी (Farmer) भरडला जातोय. त्यामुळे आता शेतकऱ्याने थेट नोटावर शिक्का मारण्याचा मनसुबा तयार केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

७०० ते १२०० रुपयेच मिळतोय भाव 

मागच्या काही वर्षांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांद्याला योग्य भाव देणारी बाजार समिती म्हणून नावालौकिकास आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील शेतकऱ्यांचा ओढा हा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वळल्याचं दिसून आलं. कांद्याचे होणारे वेळेत लिलाव आणि त्याच बरोबर शेतकऱ्याला हव्या असलेल्या वेळेत मिळणारी योग्य रक्कम यामुळे शेतकरी राजा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वळला गेला होता. मात्र मागच्या काही महिन्यांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियोजन पुरता ढासळले. पाच ते आठ हजार प्रतिक्विंटल कांद्याला मिळणारा भाव आता ७०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलवर येऊन ठेपला आहे. 

तर रस्त्यावर फिरू देणार नाही 

शेतकऱ्यांच्या या प्रतिक्रियेचे राजकीय वर्तुळात ही मोठ्या प्रमाणामध्ये पडसाद उटताना पाहायला मिळत आहेत. कांदा उत्पादक शेतकरी हा सध्या मरणाच्या दारावर उभा आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी राजाचा आक्रोश लवकरात लवकर समजून घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी हटवावी. अन्यथा येत्या काळात सत्ताधारी आणि विरोधीक राजकीय नेत्यांना शेतकरी राजा रस्त्यावर फिरू देणार नाही; असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT