सिंधुदुर्ग : जल पर्यटकांसाठी एक वाईट बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच समुद्रकिनाऱ्यावर होणारे जलपर्यटन बंद करण्यात आलं आहे. उद्यापासून म्हणजेच २६ मे पासून जलपर्यटन बंद होणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व प्रकारचे जलपर्यटन २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश बंदर आणि पर्यटन विभागाने जारी केलेत. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी २६ मेपासून सागरी जलपर्यटन आणि सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या बंदीमुळे हिरमोड होणार आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनने बंदर विभागाकडे काही दिवसांची मुदतवाढ मागितली होती. तरीही सागरी जलपर्यटनाबरोबर समुद्रात मालवाहतूक करणारी जहाजे तसेच नद्या किंवा तलावातील जल पर्यटनालासुद्धा ही बंदी लागू असणार आहे.
मे महिन्यातील पर्यटन हंगाम १५ मे नंतर वाढत असते. त्यामुळे मासेमारी हंगामाप्रमाणे आपणास ३१ मेपर्यंतचा हंगाम कायम करावा, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु याआधी हवामानाचा अंदाज घेऊन बंदर विभागाने काही दिवसांसाठी टप्याटप्याने मुदतवाढ दिलीय, असे सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी, वाहतूक वेल्फेअर असोसिएशनचे म्हटलंय. २०१६ मधील मुदतवाढ आदेशाची प्रतसुद्धा संघटनेने आपल्या निवेदनासोबत बंदर विभागाला सादर केलीय. मागील वर्षी सुद्धा पावसाळी हंगामामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जलपर्यटन बंद करण्यात आले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.