Shivani Vadettiwar saam Tv (X Twitter)
महाराष्ट्र

Shivani Vadettiwar: सरकारी नोकऱ्या हिरावण्याचा डाव उधळून लावा: शिवानी वडेट्टीवार यांचे युवकांना आवाहन

Shivani Vadettiwar: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी कंत्राटी भरतीवरून आंदोलनाचा इशारा दिलाय.

Bharat Jadhav

Shivani Vadettiwar:

कंत्राटी भरतीवरून राज्य सरकारवर विरोधकाकडून टीका केली जात आहे. सरकारविरोधात विरोधकांनी मोर्चाचा एल्गार उभारला आहे. युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी युवकांना जनआक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे. (Latest News)

विविध सरकारी विभागातील अनेक पदे न भरल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये नाराजी आहे. त्यात या सरकारने शासकीय कंत्राटी भरतीचा शासन निर्णय काढून राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांची एकप्रकारे थट्टाच केली आहे. कंत्राटी भरतीमुळे आरक्षण हिरावण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सरकारचा नोकऱ्या हिरवण्याचा पंचवार्षिक डाव उधळवून लावण्यासाठी. आपले संविधानिक हक्क, शिक्षण आणि नोकरी वाचविण्यासाठी या जनआक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन शिवानी वडेट्टीवार यांनी केले आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. २० ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथे हा मोर्चा आयोजित केला जाणार आहे. युवकांना आवाहन करताना शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, संविधानाने आपल्याला आरक्षणाची सर्वात मोठी ताकद दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र थेट सरकारी कर्मचारी भरतीला पर्याय म्हणून राज्य सरकार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरती करत आहे. त्या शासन निर्णयामुळे ओबीसी, एससी आणि एसटी या प्रवर्गातील लोकांच्या आरक्षित जागा संपवून, त्‍यांचा हक्क संपुष्टात आणून आरक्षाणालाच बगल दिली जात आहे. शासननिर्णय पान क्रमांक पाचवरील सहाव्या मुद्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, पाच वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाईल. मात्र पाच वर्ष हा मोठा कालावधी असून अनेकांना यामुळे शासकीय नोकरीपासून वंचित राहावे लागणार आहे.

या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून शासकीय नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याच्या मेहनतीवर पाणी फिरेल आणि त्यांच आयुष्य उद्धवस्त होईल. पाच वर्षांसाठी कंत्राटी भरतीचा शासननिर्णय काढला आहे आताच याला विरोध केला नाही तर पुढे जाऊन १० वर्षांचा कंत्राटी भरतीचा शासननिर्णय काढला जाईल. त्यामाध्यमातून आपला आरक्षणाचा हक्क हिरावून घेतला जाईल, म्हणूनच याविरोधात रस्त्यावर येण्याची आवश्यकता असल्याचं त्या म्हणाल्या.

भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपले हक्क आणि अधिकार सुरक्षित केले गेले आहेत. मात्र आज सरकारने शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करुन आपल्या हक्काची सरकारी नोकरी संपवायला सुरुवात केली आहे. जि.प. शाळेच्या खासगीकरणातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद करण्याचा घाट घातला असल्याचं शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT