shahapur villagers demands electric dp Saam Digital
महाराष्ट्र

Mahavitran वर शहरापूर ग्रामस्थांचा राेष, 8 दिवस झाले गावात लाईट नाही, DP कधी बसवणार?

Mahavitran Nanded News : वीज पुरवठा खंडित असल्याने शहापूरच्या ग्रामस्थांना शेजारच्या गावातून पाणी आणावं लागतंय. रात्र देखील संपुर्णत: अंधारात काढावी लागत आहे.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे नांदेड जिल्ह्यातील शहापूर या गावात गेल्या आठ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत असल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला आहे. महावितरण कंपनीने गावात डीपी बसवून द्यावा अन्यथा आत्मदहन आंदाेलन करु असा इशाला ग्रामस्थांनी प्रशासनास दिला आहे.

नांदेड जिल्ह्यात तापमानाने उंच्चाक गाठला आहे.वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. अशा वाढत्या तापमानात दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शहापूर गावकऱ्यांवर आली आहे. ही वेळ आणली आहे महावितरण कंपनीने.

मागील आठ दिवसा पासून शहापूर गावाचा वीज पुरवठा बंद आहे. गावाला आणि शेतीला वीज पुरवठा करणारे विद्युत डीपी जाळले आहेत. त्यामुळे शहापूर गावाला अनेक समस्यांना तोंड द्याव लागत आहे.

वीज पुरवठा खंडित असल्याने शेजारच्या गावातून पाणी आणावं लागतंय. रात्र देखील संपुर्णत: अंधारात काढावी लागत आहे. महावितरण कार्यालयाचे दररोज खेटे मारून या गावातील नागरिक थकले. परंतु अद्याप महावितरण कंपनीने या गावात डीपी बसवून दिला नाही. परिणामी गावकऱ्यांनी आता आत्मदहनाचा इशारा प्रशासनास दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचे होणार लोकार्पण

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

SCROLL FOR NEXT