फैय्याज शेख
शहापूर : शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्य क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असून येथे झाडे तोडणे व लाकडांची वाहतूक करणे वन कायद्याने गुन्हा आहे. मात्र याच जंगलात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी महाप्रताप केला असून जंगलातून लाकडांची वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. रात्रीच्या वेळी लाकडांनी भरून जाणारा ट्रक येथील गावकऱ्यांनी अडविल्याने हा प्रकार समोर आला आहे.
शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्याच्या जंगलात दुर्मिळ जातीचे पक्षी आढळतात. यांचे संगोपन करणे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे. या जंगलात कर्कश आवाज करणे देखील बंदी असताना कोणत्याही प्रकारची लाकडांची वाहतूक करणे वन कायद्याने बंदी आहे. वाहने जप्त करण्याचा देखील अधिकार वन विभागाला आहे. असे असताना भर दिवसा हे प्रकार सुरू असल्याने भरगच्च पगार घेणारे कर्मचारी करतात काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गावकर्यांनी अडविला लाकडांचा ट्रक
प्रादेशिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वन्य जीव राखीव जंगलात कोणता अधिकार नसताना जंगलात असलेल्या घराच्या लाकडांना वन कायद्याला केराची टोपली दाखवत परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे गावकरी संतप्त झाले असून त्यांनी लाकडांनी भरलेली ट्रक जंगलातच आडवून ठेवली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसी संपर्क साधाला व ट्रक वर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र एकही वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेच नाही.
गावकऱ्यांची पोलिसांकडे दाद
वन अधिकारी न आल्याने अखेर गावकऱ्यांनी पोलिसांकडे दाद मागितली. मात्र तानसा अभयारण्य हे वन्यजीव संरक्षण कायद्यात मोडत असल्याने पोलिसांनी देखील हात वर केले. आता या सर्व बाबींकडे ठाणे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी असी मागणी गावकरी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.