२ कोटींच्या खंडणी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणामध्ये वाल्मीक कराडच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे. खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटेची चौकशीत मोठी कबुली दिली आहे. वाल्मीक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते, अशी कबुली विष्णू चाटेने सीआयडीला दिली आहे. सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हा मोठा खुलासा केला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मीक कराडच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. २ कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीच्या गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे सध्या पोलिस कोठडीत आहे. विष्णू चाटेची सीआयडीने कसून चौकशी केली. त्याने वाल्मीक कराडबाबत धक्कादायक माहिती दिली त्यामुळे या प्रकरणात वाल्मीक कराड आणखी गोत्यात येणार आहे. वाल्मीक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते, अशी कबुली चाटेने दिली आहे.
सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात असा खुलासा करण्यात आला आहे की, विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडने धमकी दिल्याची तक्रार पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. कराडने पवचक्की कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केली असल्याचे चाटे याने आता कबूल केले आहे. त्यामुळे वाल्मीक कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.