Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sugarcane : ६० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन कमी; हवामान बदलामुळे घटलेल्या ऊस उत्पादनाचा परिणाम

Sangli News : यंदाच्या वर्षी देशातच बदलत्या हवामानाचा फटका हा ऊस शेतीला मोठ्या प्रमाणात बसला. अवकाळी पाऊस, कमी थंडी आणि उन्हाची तीव्रता. यामुळे उसाच्या क्षेत्रात त्याच बरोबर उताऱ्यात घट

विजय पाटील

सांगली : देशातला साखर उद्योग यंदा आर्थिक संकटात सापडणार आहे; अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. कारण देशाच्या साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जवळपास ६० लाख मेट्रीक टन घट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रसह देशातल्या साखर उद्योगाला २४ ते २५ हजार कोटींचा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बदलत्या हवामानामुळे ऊस शेतीला बसलेल्या फटक्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे.

ऊसाचे उत्पादन चांगले झाल्यास साखर उत्पादन अधिक होण्यास मदत मिळत असते. मात्र यंदा उसाच्या उत्पादनावरच परिणाम झाल्याने साखर उत्पादनही घटले आहे. जर काही वर्षांमध्ये साखर उद्योगाला वेगळ्या अडचणीला सामोरे जावे लागते. यंदाच्या वर्षी देशातच बदलत्या हवामानाचा फटका हा ऊस शेतीला मोठ्या प्रमाणात बसला. अवकाळी पाऊस, कमी थंडी आणि उन्हाची तीव्रता. यामुळे उसाच्या क्षेत्रात त्याच बरोबर उताऱ्यात घट झाली आहे. त्याचा परिणाम साखर उत्पादनावर झाला आहे.

राज्यातील ऊस उत्पादनात २० टनांची घट 

गतवर्षी उत्तर प्रदेशला मागे टाकत महाराष्ट्राने साखर उत्पादनात अव्वल स्थान पटकावले होते. मात्र यंदा महाराष्ट्र राज्यातील हेक्टरी उसाचं उत्पादन घटले असून हेक्टरी ८५ ते ८८ टन उसाचे उत्पादन होते. यंदा ते हेक्टरी ६१ टनावर आले आहे. परिणामी साखरेचे उत्पादन जवळपास ३० ते ३५ टक्क्याने घटले आहे.

साखर हंगामावरही परिणाम
यंदाच्या साखर हंगामावर हवामान बदलाच्या परिणामामुळे १२ हजार कोटी रुपयाचे उत्पन्नात घट होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. चांगल्या जमिनीमध्ये ८० टन पेक्षा जास्त एकरी उत्पन्न होत असताना आणि मध्यम जमिनीत सात टनापेक्षा उत्पन्न जास्त होत असते. पण हवामान बदलाचा फटका ऊस उत्पादनावर थेट झाल्याने एकरी २० टनाचा फटका ऊस उत्पादकांना बसला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

मदतीची होतेय मागणी 

राज्यात नेहमीच साखर उत्पादन ऊस उत्पादन अव्वल नंबर असणारे महाराष्ट्र यंदा हवामानाच्या फटक्यामुळे पिछाडीवर गेला आहे. अवकाळी, गारपीट, प्रचंड उष्णता यामुळे यंदा गळीत हंगामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. शेतकरी हवामान बदलाच्या फटक्यामुळे ऊस शेतीपासून लांब जात असल्याचे चित्र दिसत असल्याचे चिंता व्यक्त वाटत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याला हवामान बदलाचा फटका बसला असल्याने मदतीचा हात देण्याची मागणी शेतकरी संघटनेकडून होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT