sambhajiraje chhatrapati yuvraj, maharashtra, beed, jalna saam tv
महाराष्ट्र

...म्हणून महाराष्ट्रातील राजकीय गाेंधळ संपला पाहिजे : संभाजीराजे छत्रपती

स्वराज्य संघटनेची स्थापना कशासाठी करण्यात आली आहे याबाबत संभाजीराजे छत्रपतींनी वडीगोद्री येथे नमूद केले.

लक्ष्मण सोळुंके

जालना : राज्यात (maharashtra) सर्वसामान्य माणसांचे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे राज्यात कुणीही सत्तेत या आणि कुणीही विरोधात बसा पण राज्यात सुरू असलेला गोंधळ लवकरात लवकर संपवा आणि सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवा असे संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati) यांनी म्हटलं आहे. (sambhajiraje chhatrapati yuvraj latest marathi news)

संभाजीराजे छत्रपती बीड येथे कार्यक्रमासाठी जात असताना जालन्यातील वडीगोद्री येथे काही काळ थांबले हाेते. एका कार्यक्रमात राजेंनी सध्याच्या महाराष्ट्रातील सुरु असलेल्या राजकीय घडामाेडींवर भाष्य केले.

ते म्हणाले सध्या राज्यात अनेक घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातच राज्यात अजून ही पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे राज्यातील गोंधळ संपवून प्रलंबित प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. दरम्यान स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून शेतकरी प्रश्न असो किंवा सर्वसामान्य प्रश्न असाे हे सोडवण्याचे काम करु या. काेणाला सत्तेत बसायची आहे त्यांनी सत्ते बसा. काेणाला विराेधात बसायचे आहे त्यांनी विराेधात बसा पण शेतक-यांचे प्रश्न तातडीने साेडविण्यासाठी प्रयत्न करा.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळेंचं मंत्री संजय सावकारे यांचा कार्यालयाच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन

Akola Politics: भाजपची डोकेदुखी वाढली, अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली, नेमकं काय घडलं?

Pune Accident: नवले पुलावरून जाताना ब्रेक फेल, कंटेनर अनेक वाहनांना उडवत गेला; मृतांचा आकडा वाढण्याची भीती, थरकाप उडवणारा VIDEO

kalakand Recipe: संध्याकाळी गोड खायला आवडतं? मग, आज घरी नक्की बनवा हॉटेल स्टाईल कलाकंद, वाचा सोपी रेसिपी

Pune Navale Bridge Accident: काचांचा ढीग, वाहनं पेटली, ५ जणांचा जागीच मृत्यू पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात | VIDEO

SCROLL FOR NEXT