Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News: अडीच महिन्यांपासून नाही पाणी; महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

Sambhajinagar News : अडीच महिन्यांपासून नाही पाणी; महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्याचे दिवस सुरु असताना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यंदा पावसाळा (Sambhajinagar) चांगला न झाल्याने पाण्याची समस्या जाणवत आहे. यात मागील अडीच महिन्यापासून गावात पाणी पुरवठा करण्यात आला नाही. यामुळे संतप्त महिलांनी आज (Grampanchayat) ग्राम पंचायतीवर हंडा मोर्चा काढला. (Tajya Batmya)

संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ७४ जळगाव, खाम जळगाव, शहापूर मानेगाव या ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत काही प्रभागात रोज पाणी सोडले जात होते. पण, एका वस्तीतील प्रभागात अडीच महिन्यांपासून ग्रामपंचायतीने पाणी सोडले नाही. त्यामुळे या परिसरातील महिलांनी हंडा मोर्चा काढला होता. 

दोन दिवसात पाणी सोडण्याचे आश्वासन 

७४ जळगाव ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत एका वस्तीमध्ये तब्बल अडीच महिन्यांपासून पाणी पुरवठा करण्यात आला नाही. परिणामी, या भागातील ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत असून आज महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. त्यावर ग्रामसेवकाने दोन दिवसांत पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

Pitod Recipe : भाजी संपलीय? मग झटपट बनवा खमंग 'पितोड', चवीला लागेल भन्नाट

Political News: मोठी बातमी! 'त्या' २० बंडखोर खासदारांना झटका, सुप्रीम कोर्टाने बजवली नोटीस

SCROLL FOR NEXT