Sambhajinagar Water Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Water Supply : अखेर हर्सूलच्या मृतसाठ्यातून पाणी उपसा; जुन्या शहरातील पाणी प्रश्न मिटला

Sambhajinagar News : हर्सूल तलावातील जलसाठा दोन ते तीन टक्क्यावर आल्याने मागील एक आठवडाभरापासून त्यातून पाण्याचा उपसा बंद करण्यात आला होता.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे  

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील १४ वार्डांना पाणी पुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावाने तळ गाठला आहे. केवळ अडीच फूट पाणी या तलावात राहिले असल्याने या भागात पाणी पुरवठा करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु तलावातील मृत साठ्यातून उपसा करण्यास सुरवात करण्यात आल्याने पाण्याचा प्रश्न सध्या तरी मिटला आहे. 

हर्सूल तलावातील (Sambhajinagar) जलसाठा दोन ते तीन टक्क्यावर आल्याने मागील एक आठवडाभरापासून त्यातून पाण्याचा उपसा बंद करण्यात आला होता. हा उपसा बंद झाल्याने हर्सूलच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शहरातील १४ वार्डांचा भार (Jayakwadi Dam) जायकवाडीतून येणाऱ्या पाण्यावर पडला होता. त्यामुळे शहरातील अन्य वसाहतीमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली होती. दरम्यान आता तलावाच्या मृत साठ्यातून उपसा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

जनरेटर बसवून पंप सुरु 

संभाजीनगर महापालिका पाणी पुरवठा (Water Supply) विभागाने हर्सूल तलावातील मृत जलसाठ्यातून पाण्याचा उपसा सुरू करण्यासाठी जनरेटर बसवून पंप सुरू केले. त्यामुळे या पाण्यावर अवलंबून असलेल्या १४ वार्डाचा पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. शिवाय जयकवाडीमधून होत असलेल्या पाणी पुरवठ्यावरील भर देखील कमी झाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT