satara, ruchesh jayvanshi, Khirkhindi saam tv
महाराष्ट्र

Saam Impact : कोयना जलाशयातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास थांबणार; जिल्हाधिकारी, ग्रामस्थ बैठकीस यश

मुंबई उच्च न्यायालयाने देखील याची गंभिर दखल घेत सुमोटो याचिका दाखल केली होती.

ओंकार कदम

सातारा : खिरखंडी (khirkhandi) येथील व्याघ्र प्रकल्प पुनर्वसनाचा प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावला जाईल असा विश्वास जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी (ruchesh jayvanshi) यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला. साताऱ्यातील (Satara) खिरखंडी येथील विद्यार्थ्यांचा (students) शिक्षणासाठी होणारा खडतर प्रवासाची साम टिव्हीने बातमी दाखवली त्यानंतर तेथे मदत पाेहचली. आता जिल्हाधिकारी जयवंशी रुजू झाल्यानंतर त्यांनी खिरंखंडीस (khirkhandi News) ठिकाणी भेट देऊन ग्रामस्थांची भेट घेतली. त्यानंतर साम टीव्हीशी बाेलताना त्यांनी मुलांच्या शिक्षणाचा (education) प्रश्न मार्गी लागला आहे. ग्रामस्थांनी मुलांना वसतीगृहात ठेवण्यास मान्यता दिल्याचे सांगितलं. (Ruchesh Jayvanshi Latest Marathi News)

जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले खिरखंडी येथील ग्रामस्थांशी मी स्वत: चर्चा केली. पुनर्वसन मान्य नसल्याने या गावातील सहा खातेदार हे अद्यापही मूळ खिरखंडी या गावात वास्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय बिकट बनला होता.

ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या जीवाचा प्रश्न असल्याने मुलांना वसतिगृहात ठेवण्याची विनंती केली. या निर्णयास ग्रामस्थांनी मान्यता दिली आहे. तसेच या कुटुंबाचे लवकरच पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल असेही जिल्हाधिकारी जयवंशी यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : हाय बीपीचा त्रास आहे? मग 'या' 7 पदार्थांपासून राहा दूर,ह्रदय राहील निरोगी

Tuesday Horoscope : आर्थिक लाभ होणार; ५ राशींच्या व्यक्तींना मिळणार नव्या संधी, वाचा आजचे राशीभविष्य

Blood Pressure : BP नियंत्रणात ठेवायचा आहे? मग पाणी पिण्याच्या या 7 गोष्टी अजिबात दुर्लक्षित करू नका

Mumbai AC Local Train: लोकलचं AC बंद, प्रवासी गुदमरले; आता लोकलच्या आतही मृत्यूची भीती?

Amir Khan Marriage: आमिर खान लव जिहादचा ब्रँड अम्बेसेडर; तिसऱ्या लग्नावरून वाद उफाळला

SCROLL FOR NEXT