ganesh idol 
महाराष्ट्र

काेल्हापूरवासियांनाे! बाप्पाच्या विसर्जनासाठी निघालात? हे वाचा

संभाजी थोरात

कोल्हापूर : काेविड १९ चा आणि महापूराच्या संकटाच्या सामन्यानंतर आलेला गणेशाेत्सव काेल्हापूरवासियांनी उत्साहात साजरा केला. नागरिकांनी घराेघरी 'श्रीं'ची स्थापना करुन भक्तीभावाने पूजा अर्चा केला. आज (मंगळवार) पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन आहे. त्यासाठी सकाळपासून घराेघरी तसेच सार्वजनिक मंडळांची धांदल सुरु झाली आहे. दरम्यान महापालिकेने पंचगंगा नदीत panchganga river गणेश विसर्जनास ganesh idol immersion बंदी घातली आहे. भाविकांनी इराणी खणीत विसर्जन करावे असे आवाहन काेल्हापूर महापालिकेच्या प्रशासक डाॅ. कांदबरी बलकवडे kadambari balkawade यांनी केले आहे.

शहरातील वेगवेगळ्या प्रभागांत विसर्जनासाठी कृत्रिम कुंड ठेवले आहेत. इराणी खणीत विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. निर्माल्य तसेच अन्य सजावटीचे साहित्य देखील नदी पात्रात टाकले जावू नये यासाठी पथक नेमण्यात आले आहे. काेविडच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून यापुर्वी नागरिकांना सूचना करण्यात आल्या आहेत. उत्सव काळात बहुतांश नागरिकांनी आराेग्य विषयक जागृती केली आहे.

आज पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन हाेणार असून नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. पंचगंगा नदीत विसर्जनास बंदी असल्याने कळंबा, मोरेवाडी येथील मंडळांनी त्यांच्या परिसरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन पाेलिस दलाने केले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT